शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

बारी घाटात बस दरीत कोसळली, सुदैवाने जीविहानी टळली, तीन प्रवाशी किरकोळ जखमी

By admin | Published: July 21, 2016 3:27 PM

अकोले आगाराची अकोले ते कसारा जाणारी राज्य परिवहन मंडळाची बस आज सकाळी ब्रेक निकामी झाल्याने तसेच बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने बारी घाटातल्या दरीत गेली

ऑनलाइन लोकमतघोटी (नाशिक), दि. २१ : अकोले आगाराची अकोले ते कसारा जाणारी राज्य परिवहन मंडळाची बस आज सकाळी ब्रेक निकामी झाल्याने तसेच बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने बारी घाटातल्या दरीत गेली.दरम्यान या बसचे पुढील बंपर तुटल्याने हि बस सुमारे दीड हजाराहून अधिक खोल दरीत कोसळल्यापासून वाचली.यावेळी चालकाने प्रसंगावधान राखल्याने बसमधील चाळीस प्रवाशांचे प्राण वाचले.

अकोले आगाराची अकोले हुन कसार्या ला जाण्यासाठी एम.एच.१४ ,बी,टी.११५८ हि बस कासर्या कडे सकाळी साडे आठ वाजता आगारातून निघाली होती.बसचालक मिश्चद्र घोडके व वाहक वर्पे हे चाळीस प्रवासी घेऊन सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास बारी घाटातून येत असताना रस्त्यावरील एका खड्ड्यात बस आदळली.यामुळे बसमध्ये तांत्रिक बिघाड होऊन बसचे ब्रेक निकामी झाले.अशा स्थितीत बस उजव्या बाजूला खोल दरीत गेली.

दरम्यान बस ने रस्ता सोडल्यामुळे बस खाचरात आदळत गेल्याने पुढील काही साहित्य तुटून ते जमिनीत रोवल्यामुळे हि बस खोल दरीच्या अवघ्या काही फुटाच्या अंतरावर थांबविब्यात चालकाला यश आले.यामुळे सुदैवाने बस मधील चाळीस प्रवाशांचे प्राण वाचले.यात चालकासह चार प्रवाशी किरकोळ जखमी झाले असून जखमी प्रवाशांना उपचारार्थ अकोले येथील ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच घोटीचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्यासह उपनिरीक्षक कमलेश बच्छाव हवालदार नितीन भालेराव ,चारोस्कर आदींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारार्थ रु ग्णालयात हलविले.

मोठा अनर्थ टळलादरम्यान या बसमधील चाळीस प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणून हि बस सुमारे पंधराशे फूट खोलीच्या दरीच्या अवघ्या दहा ते पंधरा फुटाच्या अंतरावर थांबली.हि बस पुढे गेली असती तर माळशेज घाटात मागील वर्षी जाणार्या अपघाताची पुर्नरावृत्ती झाली असती.व अनेकांचा बळी गेला असता.केवळ चालकाच्या प्रसंगावधनामुळे मोठा अनर्थ टळला आहे.संरक्षण भीती नसल्याने बारी घाट बनला अपघाताचे केंद्रनगर आण नाशिक जिल्ह्याला जोडणार्या या बारी घाटात गेली काही वर्षापासून अनेक अपघात झाले आहेत.या घाटात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एकही दिशादर्शक फलक नसल्याने,तसेच संरक्षण भिंती अथवा जाळ्या नसल्याने अपघात वाढत आहेत.या घाटात जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ होत असताना सार्वजनिक बांधकाम विभाग या बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याने वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.