शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
5
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
6
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
7
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
8
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
9
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
10
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
11
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
12
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
13
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
14
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
15
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
16
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
17
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
18
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
19
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
20
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट

'चलो बारसू' राजू शेट्टींनी राज्यातील शेतकऱ्यांना दिली हाक; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 4:12 PM

आंदोलनकर्त्यांची २ हात करायची तयारी सरकारने दाखवावी असं आव्हान शेट्टींनी शिंदे-फडणवीस सरकारला दिले आहे. 

कोल्हापूर - रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यात होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला बारसूच्या स्थानिकांनी विरोध केला आहे. गेल्या ४ दिवसांपासून याठिकाणी आंदोलन सुरू आहे. केंद्राकडून आलेल्या सर्वेक्षण पथकाला स्थानिकांनी विरोध केला आहे. या आंदोलनकर्त्यांनी बळजबरीने सर्वेक्षणस्थळी घुसण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर केला. बारसूतील तणावग्रस्त परिस्थितीवर आता विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात प्रामुख्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही सरकारला इशारा दिला आहे. 

माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, रत्नागिरी बारसूतील शेतकरी एकाकी आहेत. म्हणून पोलीस दडपशाहीचा वापर करून जर हे आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करत असेल. तर मी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना हाक देतो. चला बारसूला, तेथील शेतकऱ्यांना वाचवूया. बघू यांच्याकडे गोळ्या किती, लाठ्या किती आहेत. पोलीस किती आहेत. आंदोलनकर्त्यांची २ हात करायची तयारी सरकारने दाखवावी असं आव्हान शेट्टींनी शिंदे-फडणवीस सरकारला दिले आहे. 

तसेच बारसू येथे झालेल्या पोलीस दडपशाहीचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. याठिकाणी आंदोलन करणाऱ्या शेतकरी स्त्री पुरुषावर बेशुद्ध होईपर्यंत प्रचंड लाठीचार्ज झालेला आहे. बारसू कोकणात आहे, महाराष्ट्रात आहे का की आणखी कुठे आहे हे कळत नाही. या लोकशाहीत जर एखाद्याला जमीन द्यायची नसेल अशी भूमिका भूमिपुत्रांनी घेतली आणि त्याला बेशुद्ध होईपर्यंत मारणार असाल तर पोलिसांना आणि त्यांना आदेश देणाऱ्या राज्यकर्त्यांना शरम वाटायला हवी अशा शब्दात राजू शेट्टींनी घणाघात केला. 

बारसू पेटलं...बारसू येथे रिफायनरी प्रकल्पाविरोधात महिला आणि युवक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. पोलिसांचा तगडा बंदोबस्त असताना ज्याठिकाणी सर्वेक्षण सुरू होते तिथे लोकांनी घुसण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जचा वापर केला. आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. परंतु पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाल्याचं दिसून आले. लोकांचा जमाव मोठ्या संख्येने असल्याने पोलिसांनी लाठीचार्जचा वापर केला. 

आंदोलन भडकवण्यामागे षडयंत्रकाहीजण लोकांची माथी भडकवण्याचे काम करत आहेत ते थांबवावे. शेतकऱ्यांना पुढे करून ज्यापद्धतीने राजकारण केले जातेय हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय घातक राजकारण आहे. खासदारांना काय शंका असतील त्या दूर करू. सर्वेक्षणाठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांना ताब्यात घेतले. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायला तयार आहोत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करू शकतात. पण लोकांची माथी भडकावू नका. राजापूरच्या गेस्टहाऊसला कुणाची बैठक झाली? यामागचे षडयंत्र काय हे समोर आणा. पोलीस आक्रमक झालेत हे दाखवून द्यायचे आहे असा आरोप पालकमंत्री उदय सामंत यांनी केला.  

टॅग्स :Barsu Refinery Projectबारसू रिफायनरी प्रकल्पRaju Shettyराजू शेट्टीFarmers Protestशेतकरी आंदोलन