शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीमधील वाद मिटला, कोल्हेंनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली; फेसबुकवर केली भावनिक पोस्ट
2
जनतेच्या मनातला सामान्य आमदार मिळेल; उमेदवारी घोषित होताच महेश सावंत यांचा टोला
3
राज ठाकरेंच्या उमेदवारांना भाजप पाठिंबा देणार? बाळा नांदगावकरांचे महत्वाचे वक्तव्य
4
माहिमच्या हायप्रोफाइल लढतीत उद्धव ठाकरेंनी उतरवला शिवसैनिक, कोण आहेत महेश सावंत?
5
Mahayuti Seat Sharing: 106 जागांचा गुंता, कोणत्या विभागातील किती जागांची घोषणा बाकी?
6
मंत्रि‍पदासाठी फोन आला, १०० रुपये उसने घेऊन कपडे घेतले अन् शपथविधीला गेले; श्रीगोंद्यातील नेत्याचा किस्सा! 
7
अरे देवा! ७ मुलांची आई बॉयफ्रेंडसह पळून गेली, ढसाढसा रडत मुलांनी गाठलं पोलीस ठाणं, म्हणाले...
8
“१०५चा आकडा फेक, मविआत ४-५ जागांवर अजून मतभेद”: नाना पटोले; काँग्रेसची यादी कधी येणार?
9
उमेदवारी जाहीर होताच अमित ठाकरेंना सदा सरवणकरांनी डिवचलं; म्हणाले, "एक दिवस..."
10
प्रभासने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिले सरप्राइज, 'राजा साब'चा दमदार पोस्टर रिलीज
11
Jio Financial ची आणखी एक खेळी; 'या' कंपनीसोबत विकणार इन्शूरन्स पॉलिसी, चर्चा कुठवर?
12
बेंजामिन नेतन्याहू यांच्या बेडरूमपर्यंत पोहोचलं हिजबुल्लाहचं ड्रोन, पण...! इस्रायलचं टेन्शन वाढलं
13
दिवाळीत Cash मध्ये केवळ 'इतकं'च खरेदी करू शकता Gold; जास्त घेतल्यास द्यावी लागेल 'ही' माहिती
14
चोरी करण्यासाठी विमानाने जायचे; हायटेक गँगचा पोलिसांनी केला पर्दाफाश, ५ जणांना अटक
15
माहिममध्ये रंगणार तिरंगी लढत, ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना उमेदवारी जाहीर
16
प्रियंका गांधी यांनी वायनाड येथून भरला उमेदवारी अर्ज, काँग्रेसकडून जोरदार शक्तिप्रदर्शन
17
एकाच घरात आमदार, खासदार पदे; राज्याच्या राजकारणात फक्त 'या' घराण्यांचं वर्चस्व?
18
जाहीर सभेत प्रवीण माने हुंदके देऊन ढसाढसा रडले, वडिलांच्याही डोळ्यांत पाणी; नेमकं काय घडलं?
19
'अचानक सर्वकाही ठीक होईल, या भ्रमात राहू नका', भारत-चीन करारावर व्हीके सिंह स्पष्ट बोलले
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राधानगरीच्या के.पी. पाटलांनी ठाकरे गटात केला प्रवेश; शिंदे गटाच्या आबिटकरांविरोधात रिंगणात उतरणार

अधिवेशनाची वादळी सुरुवात!

By admin | Published: March 10, 2015 4:31 AM

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून वादळी प्रारंभ झाला. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी आक्रमक होत सरकारला धारेवर धरले. अवकाळी पावसात नुकसान झालेल्या

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून वादळी प्रारंभ झाला. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी आक्रमक होत सरकारला धारेवर धरले. अवकाळी पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत नाकारणाऱ्या फडणवीस सरकारच्या विरोधात घोषणा देत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या गाडीला घेराव घातला. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अभिभाषणाने सोमवारी अधिवेशनाला सुरुवात झाली. या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. राज्यपाल विधान भवन परिसरात दाखल होताच विरोधीपक्षाच्या आमदारांनी त्यांना सरकारच्या निषेधाचे फलक दाखविले. अभिभाषण सुरू असताना, ‘कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्येचा धिक्कार असो’, ‘नुकसानभरपाई न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, मराठा, मुस्लीम आणि धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे,’ अशा घोषणा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी दिल्या. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उभे राहून मागे गोंधळ घालणाऱ्या आमदारांची नावे लिहून घेत असल्याचे हावभाव करू लागले तेव्हा विरोधकांनी त्यांना खाली बसण्यास सांगितले. दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करून पहिल्या दिवसाचे कामकाज तहकूब करण्यात आले. (विशेष प्रतिनिधी)