राजीव मुळ्ये- बेळगाव -तब्बल ५५ वर्षांनी होत असलेले नाट्य संमेलन, त्यानिमित्ताने सीमाभागात वास्तव्याला आलेली मराठी रंगभूमी आणि चित्रसृष्टीतील लाडके तारे, सादरीकरणासाठी सजलेले पाच रंगमंच अशा भारलेल्या वातावरणात बेळगावनगरी नांदीच्या सुरावटीसाठी आतुर झाली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिलेली भव्य नाट्यनगरी आणि स्मिता तळवलकर यांचे नाव दिलेला प्रशस्त रंगमंच उद्या (शनिवार) हजारोंच्या गर्दीने ओसंडून वाहणार आहे. या देखण्या मुख्य शामियानात साडेतीन हजारांहून अधिक प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. लालचुटुक जाजम अंथरलेला हा शामियाना खास पाहुण्यांच्या प्रतीक्षेत आहे. स्मिता तळवलकर रंगमंचावर अत्यंत आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. मोरांच्या प्रतिकृती असलेली मोती रंगाची मखर गडद निळ्या बॅकड्रॉपवर उठून दिसत आहे. मुख्य रंगमंचावर नटराज आणि संकुचित केले आहे. मात्र ज्ञानेश्वरी, महानुभवापुरते मर्यादित नसून त्याचा आवाका मोठा आहे. आपल्या मूल्यांच्या आग्रहासाठी धडपडत आलो. यापुढेही माझी हीच भूमिका राहील. आगामी घुमान येथील साहित्य संमेलन हे मोडकळीस आलेले आहे. ते बंद झालेलेच बरे, त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. साहित्य संमेलनावर वेळ घालवून काहीच उपयोग नाही, केवळ वाद आणि विशिष्ट वर्गापुरती केलेली वायफळ धडपड म्हणजेच साहित्य संमेलन आहे.२७ मे १९३८ मध्ये खान्देशातील सांगावी येथे जन्मलेल्या नेमाडे यांचे सहा कादंबऱ्या, दोन कविता संग्रह, पाच मराठी व दोन इंग्रजी समीक्षाग्रंथ हे त्यांचे साहित्यातील ठळक योगदान. कोसलाच्या यशानंतर नेमाडेंनी बिढार, जरीला व झूल या चांगदेव पाटील या कादंबऱ्या लिहिल्या. मेलडी’हे काव्यसंग्रहही प्रसिद्ध असून त्यांची हिंदी व इंग्रजी भाषांतरेही प्रकाशित झाली आहेत. हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ ही तीन वर्षांपूर्वी आलेली कादंबरी साहित्यजगतात उलथापालथ करून गेली.
नांदीच्या सुरावटीसाठी बेळगाव आतुर
By admin | Published: February 06, 2015 11:47 PM