शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
2
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
3
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
4
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
5
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
6
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
7
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
8
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
9
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
10
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
11
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
12
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
13
'भाऊ बोलून गळा पकडायचा!' अंकिताने सूरजला केलं टार्गेट, DP चांगलाच भडकला! प्रोमो बघाच
14
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
15
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
16
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
17
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
18
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
19
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
20
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी

दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत भारत बंदचा परिणाम; स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी अडवली ट्रेन, 24 पक्षांचा बंदला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2020 10:19 AM

पोलिसांनी आंदोलन करत्यांना ट्रॅकवरून हटवले आणि ताब्यात घेतले. (Bharat Bandh)

नवी दिल्ली - केंद्रसरकारने आणलेल्या कृषी कायद्याला विरोध करत आज शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. या बंदनुसार, सकाळी 11 वाज्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत चक्का जाम करण्यात येणार आहे. देशातील जवळपास दोन डझन राजकीय पक्षांनी या बंदला पाठींबा दर्शवला आहे. याशिवाय अनेक संघटनाही शेतकऱ्यांच्या बाजुने उभ्या ठाकल्या आहेत. आजच्या भारत बंदमुळे अनेक ठिकाणच्या दळणवळणावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातही भारतबंदचा परिणाम, रेल्वे अडवली - आजच्या भारतबंदला महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही पाठिंबा दिला आहे. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे रेल्वे अडवली होती. यानंतर पोलिसांनी आंदोलन करत्यांना ट्रॅकवरून हटवले आणि ताब्यात घेतले.

पुण्यातील APMC मार्केट खुले, ट्रेडर्स म्हणाले - शेतकऱ्यांना समर्थन -आमच्या शेतरी आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. मात्र, आज आम्ही बाजारपेठ सुरूच ठेवणार आहोत. जेणेकरून इतर राज्यांतून येणारा शेतकऱ्यांचा माल साठता यावा अन्यथा तो कुजेल. तो उद्या विकला जाईल, असे स्थानिक व्यापारी सचिन पायगुडे यांनी म्हटले आहे. 

वेगवेगळ्या राज्यांत कडेकोट सुरक्षा व्यवस्था -शेतकऱ्यांच्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर वेवगेळ्या राज्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. बिहारमध्ये कडेकोट सुरक्षा आहे. एवढेच नाही, तर कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघण करणाऱ्यांवर कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत. दिल्ली येथील सिंधू सीमेवरही बंदच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर पोलीस आणि सुरक्षा रक्षकांना तैनात करण्यात आले आहे. 

याशिवाय देशातील अनेक राज्यांत वेगवेगळे राजकीय पक्ष या बंदला पाठिंबा दर्शवत रस्त्यावर उतरले आहेत. ओडिशातही भारत बंदच्या समर्थनार्थ डाव्या पक्षांनी भुवनेश्वर येथे रेल्वे अडवल्या. तसेच भारत बंदमध्ये तृणमूल काँग्रेसचा सहभाग नाही, मात्र, शेतकरी आंदोलनास आमचा पाठिंबा आहे, असे ममत बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

तेलंगणातील बस चालक-वाहक शेतकऱ्यांच्या समर्थनात -कामारेड्डी येथील रस्ते परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनीही शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. एका बसचालकाने म्हटले आहे, "मुख्यमंत्र्यांनी कृषी कायद्यांविरोधात आवाज उठविला. त्यांना पाठिंबा देत, आम्ही आरटीसीचे कामगार येथे आंदोलन करत आहोत. शेतकर्‍यांवर अन्याय होऊ नये."शेतकऱ्यांच्या भारत बंदला कर्नाटकातील काँग्रेस नेत्यांचाही पाठिंबा -शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारतबंदला कर्नाटकातील काँग्रेस नेतांनीही पाठींबा दर्शवला आहे. एवढेच नाही, तर या नेत्यांनी केंद्राविरोधात घोषणाबाजीही केली आणि बेंगळुरूतील विधान सौधा येथील गांधी पुतळ्यासमोर काळे झेंडेही दाखविले. यावेळी पक्षाचे नेते सिद्धरामैय्या, बीके हरिप्रसाद, रामलिंग रेड्डी आदी उपस्थित होते.

या पक्षांचा भारतबंदला पाठिंबा -1.काँग्रेस2.माकपा3.डीएमके4.सीपीआई5.राजद6. एनसीपी7.जेएमएम8.सपा 9. शिवसेना10.अकाली दल11.भाकपा-माले12. गुपकार गठबंधन13.टीएमसी14.टीआरएस15.एआयएमआयएम16. आम आदमी पार्टी17. पीडब्ल्यूपी18. बीवीए19. आरएसपी20. एफबी21. एसयूसीआय (सी)22. स्वराज इंडिया23.जेडीएस24. बसपा

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपBharat Bandhभारत बंदRaju Shettyराजू शेट्टीMaharashtraमहाराष्ट्रrailwayरेल्वे