शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

कंपन्याचे प्रॉफिट 200 कोटी अन् देणगी 1300 कोटी; प्रकाश आंबेडकरांचे केंद्रावर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 20:21 IST

राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रेची आज मुंबईतील शिवाजी पार्कवर सांगता होत आहे.

Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप आज(दि.17) मुंबईमधील छत्रपती शिवाजी पार्कवर झाला. या सभेला विरोधी पक्षांच्या India आघाडीतील अनेक नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी सभेला संबोधित करताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी इलेक्टोरल बाँड्सचा मुद्दा उपस्थित केला. ज्या कंपन्यांचे प्रॉफिट 200 कोटी रुपये आहे, त्यांनी 1300 कोटींचे बाँड्स कसे दिले? असा प्रश्न त्यांनी विचारला. ते पुढे म्हणतात, आपण सर्वांनी मिळून सरकारला याबद्दल प्रश्न विचारला पाहिजे. गृहमंत्री अमित शाह इलेक्टोरल बाँड्सवर भाष्य करतात, त्यांनी आधी याचे उत्तर द्यावे. यावेळी त्यांनी सर्वांना एकत्र येऊन लढण्याचे आवाहनही केले. तसेच, आंबेडकरांनी मोदी का परिवार, या घोषणेवरुन पंतप्रधानांवर खासगी टीकाही केली.

तेजस्वी यादव यांचे महाराष्ट्र आणि केंद्र सरकारवर टीकास्त्रयावेळी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीदेखील सरकारवर जोरदार टीका केली. महाराष्ट्र सरकारमध्ये नेते नाहीत, फक्त डिलर आहेत, असा घणाघात तेजस्वी यादवांनी केला. उद्धव ठाकरेंच्या नावाने मतं मागतात, शरद पवारांच्या नावाने मतं मागतात आणि भाजपशी डिलिंग करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वात मोठे खोटारडे आहेत. मोदी म्हणजे खोटं बोलण्याची फॅक्ट्री आहेत. खोटे बोलण्याचे ते सेलर आणि होलसेलरही आहेत. 

फारुख अब्दुल्ला यांचा EVM वर निशाणायावेळी नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी EVM बाबत मोठे विधान केले आहे. त्यांनी ईव्हीएमला चोर ठरवून आघाडीचे सरकार आल्यास मशीन काढून निवडणूक आयोगाला स्वतंत्र केले जाईल, असे म्हटले. तुम्हाला आपले मत वाचवायचे आहे. हे मशिन (ईव्हीएम) चोर आहे. मशीन काढून टाकण्यासाठी आम्ही खूप आवाज उठवला, पण तसे झाले नाही. 'इंडिया' आघाडीचे सरकार आले, तर मशीन काढून टाकू आणि निवडणूक आयोगाला मुक्त करू, असे ते म्हणाले.

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राMumbaiमुंबईcongressकाँग्रेसBJPभाजपा