शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

साध्वी प्रज्ञासिंह यांना गावबंदी करून तोंड काळे करणाऱ्या गावांना भीम आर्मी देणार पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 16:07 IST

भाजपच्या या कृतीवरून त्यांचे देशप्रेम किती बेगडी आहे हा त्यांनी त्यांच्याच कृतीतून दाखवून दिलेले आहे, अशी टीका कांबळे यांनी केली.

ठळक मुद्दे साध्वी प्रज्ञासिंह यांना लोकसभेची उमेदवारी देऊन भाजपने देशातील शहीदांचा अवमान केला असल्याची टीका महाराष्ट्र भीम आर्मीने केली आहे.अशा गावांना महाराष्ट्र भीम आर्मीच्यावतीने देशभक्त गाव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल असे कांबळे यांनी सांगितले.

मुंबई - देशासाठी आपले प्राण गमावणारे वरीष्ठ पोलीस अधिकारी शहीद हेमंत करकरे यांचा अवमान करणाऱ्या मालेगाव बाॅम्बस्फोटातील प्रमुख आरोपी व  कथित साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना लोकसभा निवडणुकीत गावबंदी करून तोंड काळे करणाऱ्या गावांचा महाराष्ट्र भीम आर्मीच्यावतीने पुरस्कार देऊन गौरव करणार असल्याची घोषणा भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोकभाऊ कांबळे यांनी केली आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांना लोकसभेची उमेदवारी देऊन भाजपने देशातील शहीदांचा अवमान केला असल्याची टीका महाराष्ट्र भीम आर्मीने केली आहे.

आपण श्राप दिल्यामुळेच हेमंत करकरे यांची हत्या झाली असे संतापजनक वक्तव्य करतानाच 26/11 आतंकवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी अजमल कसाब याची भलावण करणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांच्यासह देशासाठी शहीद झालेल्या शहीद वीर जवांनांचाही अपमान करून आपली देशविरोधी मानसिकता स्पष्ट केली असतानाही देशप्रेमाचा बागुलबुवा उभा करणा-या भाजपने त्यांना भोपाळ लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्याचा घाट घातला आहे. भाजपच्या या कृतीवरून त्यांचे देशप्रेम किती बेगडी आहे हा त्यांनी त्यांच्याच कृतीतून दाखवून दिलेले आहे, अशी टीका कांबळे यांनी केली.

भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शहीदांच्या नावाने देशभर मतांचा जोगवा मागत असतानाच त्यांचाच पक्ष शहीदांचा अवमान करणाऱ्या आणि एका आरोपीला लोकसभेचे तिकीट देऊन आपल्या देशभक्तीचे प्रमाण देत आहे त्यांच्या या कृतीचा देशभरातून विरोध होत असला तरी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे तिकीट भाजपा कायम करीत असेल तर भोपाळमधील देशप्रेमी जनता प्रचारासाठी फिरणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे तोडं काळे करावे, चप्पलाचा हार घालून गाढवावर फिरवणे अशा वेगळ्या प्रकारे सत्कार केल्याशिवाय राहणार नाही. अशा गावांना महाराष्ट्र भीम आर्मीच्यावतीने देशभक्त गाव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल असे कांबळे यांनी सांगितले.

टॅग्स :Sadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरBhim Armyभीम आर्मी