शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
2
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
3
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
4
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
5
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
6
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
7
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
8
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
9
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
10
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
12
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
13
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
14
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
15
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
16
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
17
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
18
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
19
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ

भुजबळांचा साखर कारखाना ताब्यात

By admin | Published: March 22, 2016 4:26 AM

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने सोमवारी नाशिकमधील गिरणा साखर कारखाना आणि २९० एकर जमीन अशी ५५ कोटींची मालमत्ता ताब्यात घेतली

डिप्पी वांकानी,  मुंबईमहाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने सोमवारी नाशिकमधील गिरणा साखर कारखाना आणि २९० एकर जमीन अशी ५५ कोटींची मालमत्ता ताब्यात घेतली. भुजबळ कुटुंबीयांनी ‘आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर’ या कंपनीद्वारे या कारखान्याची लिलावात खरेदी केली होती, असा ईडीचा आरोप आहे. ऋणवसुली प्राधिकरणाने २००९ मध्ये हा लिलाव केला होता. ज्या कंपनीच्या माध्यमातून कारखाना घेण्यात आला ती कंपनी भुजबळ कुटुंबीयांची असून, महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून लाचेच्या रूपाने मिळालेला पैसा याच कंपनीत वळता करण्यात आला, असे ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितले. गिरणा कारखाना लिलावाद्वारे खरेदी करण्यात आला. लिलाव प्रक्रियेतही गैरव्यवहार झाला असल्याचा संशय असून, त्याचा आम्ही तपास करत नाही आहोत, असे ईडीचा अधिकारी म्हणाला. भुजबळांच्या वतीने डमी कंपन्यांनीही बोली लावली होती. तथापि, सर्वात कमी बोली लावणाऱ्या आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला हा कारखाना देण्यात आला. ईडीने ताब्यात घेतलेल्या मालमत्तांची किंमत ढोबळ अंदाज व सरकारी दरानुसार ५५ कोटींच्या घरात आहे. तथापि, त्यांचे बाजारमूल्य आमच्या अंदाजाहून कितीतरी अधिक आहे, असे ईडीचे म्हणणे आहे. ईडीने कारखाना व हा कारखाना ज्या जमिनीवर उभा आहे ती जमीन ताब्यात घेतली असून, जप्तीच्या या कार्यवाहीची माहिती प्राधिकृत अधिकाऱ्याला ३० दिवसांच्या आत दिली जाईल. हा अधिकारी भुजबळ कुटुंबीयांकडे याबाबत स्पष्टीकरण मागेल आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतरच या जप्तीबाबत निर्णय घेईल. त्यानंतरच आम्ही परिसर रिकामा करण्याची नोटीस बजावून या मालमत्तांचा ताबा घेऊन त्यांना सील ठोकणार आहोत, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. ईडीने यापूर्वी परवेश कन्स्ट्रक्शनची ११० कोटी रुपयांची सॉलिटेअर बिल्डिंग ताब्यात घेतली होती. समीर आणि पंकज भुजबळ गेल्या डिसेंबरमध्ये या कंपनीचे संचालक होते. तत्पूर्वी ईडीने याच प्रकरणात चमणकर इन्टरप्रायजेसची १७.३५ कोटी रुपयांची मालमत्ता हस्तगत केली होती. आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लि. ही खासगी कंपनी असून २२ नोव्हेंबर २००६ रोजी तिची स्थापना केली होती. पंकज भुजबळ, समीर भुजबळ आणि सत्यन अप्पा केसरकर हे संचालक असलेल्या या कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा ३० सप्टेंबर २०१५ रोजी घेण्यात आली होती. उद्योग व्यवहार मंत्रालयाकडील नोंदीनुसार, कंपनीने शेवटचा ताळेबंद ३१ मार्च २०१५ रोजी सादर केला होता. ३१ मार्चपर्यंत कोठडीत : छगन भुजबळ यांचे पुतणे समीर याच्या न्यायालयीन कोठडीची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवण्याचा आदेश सोमवारी न्यायालयाने दिला. समीरला कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयात आणले होते.