शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

Maharashtra Politics: ठाकरे बंधूंना मोठा धक्का! शिवसेना आणि मनसेचे शेकडो पदाधिकारी शिंदे गटात, चर्चांना उधाण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 11:51 IST

Maharashtra News: वरळी, ठाणे पालघर, बोईसर आणि डहाणू येथील हजारो शिवसैनिक आणि मनसे कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Politics:एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेला प्रचंड मोठे खिंडार पडले. राज्यभरातून शिवसैनिकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला. केवळ शिवसेना नाही, तर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते शिंदे गटात सामील झाल्याचे चित्र आहे. यातच आता शिंदे गटाने ठाकरे बंधूंना मोठा धक्का असून, शिवसेना ठाकरे गट आणि मनसेमधील शेकडो पदाधिकारी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात सामील झाल्याची माहिती देण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंना मोठा झटका दिला. शिवसेना आणि मनसेच्या तब्बल साडेतीन हजार कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. हे सर्व कार्यकर्ते पालघर, बोईसर आणि डहाणू विधानसभा मतदारसंघातील असल्याचे सांगितले जात आहे. हे सर्व कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल झाले आणि त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. 

दररोजचा ओघ पाहून सर्वच पक्ष चिंतातूर झाले आहेत

शिंदे-फडणवीस सरकारकडे आमदारांचे बहुमत आहे. एक मजबूत सरकार या राज्यामध्ये काम करत आहे. आम्ही दिवसेंदिवस लोकहिताचे निर्णय घेतोय. जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत. कारण आघाडीतही काही आलबेल दिसत नाही. काही लोकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यांच्या छातीमध्ये धडकी भरली आहे. दररोजचा ओघ पाहून सर्वच पक्ष चिंतातूर झाले आहेत. असाच ओघ राहिला तर समोर राहणार काय? त्यामुळे नवीन बातम्या पसरवल्या जात आहेत. मध्यावधी निवडणुका लागतील असे बोलत आहेत. तुमचे लॉजिक काय, अशी विचारणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना केली. 

आपण एका विश्वासाने आला आहात, त्याला कुठेही तडा जाणार नाही

आपण एका विश्वासाने आलेला आहात. त्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही. हे सरकार तुमचे, आमचे सगळ्याचे आहे. सर्वसामान्यांचे हे सरकार आहे, अशी ग्वाही देत, काही जणांना पोटशूळ उठलेले आहे की, तीन महिन्यात हे सरकार एवढे काम करत आहे, मग हेच पुढचे अडीच वर्ष चालू राहिले तर काय परिस्थिती होईल? याची चिंता आणि भ्रांत त्यांच्या मनात निर्माण झाली, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरे