शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

राजकीय टोलेबाजीचे थरावर थर! सर्वसामान्यांचे मनोरंजन; ‘जय जवान’ची ९ थर रचून सलामी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 5:33 AM

ठाण्याच्या टेंभी नाका येथे स्वर्गीय आनंद दिघे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित दहीहंडी उत्सवात नऊ थरांचा मानवी मनोरा रचून सलामी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क । ठाणे/मुंबई  

निमित्त होते दहीहंडी उत्सावाचे परंतु यावेळी  उपस्थित असलेल्या नेत्यांना राज्यात अलिकडेच झालेल्या सत्तांतरांवर टीकाटिप्पणी करण्याचा मोह टाळता आला नाही. या टोलेबाजीमुळे सर्वसामान्यांचे मात्र चांगले मनोरंजन झाले. जोगेश्वरी उपनगरातील जय जवान गोविंदा पथकाच्या तरुणांनी शुक्रवारी ठाण्याच्या टेंभी नाका येथे स्वर्गीय आनंद दिघे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित दहीहंडी उत्सवात नऊ थरांचा मानवी मनोरा रचून सलामी दिली. एकावर एक थर रचण्यासाठी सरसर वर चढत असताना तिथे उपस्थित नागरिक कौतुकाने पाहत होते. 

एकनाथ शिंदे: ५० थरांची  हंडी, आम्ही आधीच फाेडली

दीड महिन्यांपूर्वी आम्ही ५० थर लावून मोठी राजकीय हंडी फोडली, असा टोला लगावतानाच, गोविंदा नऊ थर लावून हंडी फोडतात; पण आमचे थर येत्या काळात आणखी वाढतील, मलई मात्र सामान्यांना मिळेल या शब्दांत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत आणखी फोडाफोडीचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. गोकुळाष्टमीनिमित्त मुंबई, ठाण्यात दहीहंडीचे जंगी कार्यक्रम उत्साहात झाले. 

देवेंद्र फडणवीस: मलई तर सामान्यांनाच मिळणार

मुंबईतील वरळीचे जांबोरी मैदान व अन्य ठिकाणी भाजप व काही मंडळाच्या वतीने आयोजित दहीहंडी कार्यक्रमात फडणवीस यांनी, आता जी दहीहंडी फोडली आहे त्याचे लोणी सामान्यांना मिळणार आहे. राज्याच्या विकासातही हाच अनुभव सगळ्यांना येईल, मूठभर लोकांनाच सरकारचा फायदा होणार नाही, असे म्हणत आधीच्या ठाकरे सरकारला चिमटे काढले. 

आदित्य ठाकरे: थर लावले की त्यांचा थरकाप उडालाय

त्यांनी ५० थर लावले की त्यांचा थरकाप उडालाय, हे सगळ्यांना ठावूक आहे, असे प्रत्युत्तर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिले. ते म्हणाले की, किमान आज तरी राजकारण नको, प्रत्येक ठिकाणी राजकारणाची गरज नाही. २४ तास राजकारण केले तर सणांचे महत्त्व काय राहील?

टॅग्स :Dahi HandiदहीहंडीEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस