शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मोठी बातमी! ITI विद्यार्थ्यांच्या मासिक विद्यावेतनात ५०० रुपयांपर्यंत वाढीचा प्रस्ताव  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 16:00 IST

या विद्यावेतनात ५०० रुपयांपर्यंत वाढीचा प्रस्ताव असून येत्या ३ महिन्यात मंत्रिमंडळ बैठकीत याला मंजुरी मिळेल अशी माहिती मंत्र्यांनी दिली.

नागपूर - महाराष्ट्रातील ४१८ शासकीय आयटीआयच्या नूतनीकरणासाठी १२०० कोटीच्या प्रस्तावाची मागणी केली आहे. ज्याची अंमलबजावणी पुढील ६ महिन्यापर्यंत पूर्ण केली जाईल. तसेच विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ देणार नाही असं आश्वासन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानपरिषदेत दिले.

राज्यातील हजारो विद्यार्थी ITI मध्ये शिक्षण घेत असतात. या मुलांना विद्यावेतन म्हणून १९८६ पासून मासिक ४० रुपये देण्यात येत आहेत. या विद्यावेतनात ५०० रुपयांपर्यंत वाढीचा प्रस्ताव असून येत्या ३ महिन्यात मंत्रिमंडळ बैठकीत याला मंजुरी मिळेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. त्याचसोबत आयटीआयमध्ये नवीन कोर्स समाविष्य करण्याबाबत पुढील वर्षी घोषणा करू असंही मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधान परिषदेत माहिती दिली. 

मंगलप्रभात लोढा म्हणाले की, राज्यातील ३६ जिल्ह्यांसाठी एका कमिटीची स्थापना करून त्या जिल्ह्यात ज्या कंपन्या आहेत. तिथे आवश्यक असणारे स्किलसाठीचे कोर्स घेतले जातील आणि त्यारितीने मुलांना प्रशिक्षण दिले जाईल असं त्यांनी सांगितले. विधान परिषदेत विक्रम काळे, सुधीर तांबे, सतिश चव्हाण आणि बाळाराम पाटील यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनवाढीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला मंत्री लोढा यांनी उत्तर दिले. 

टॅग्स :iti collegeआयटीआय कॉलेजMangalprabhat Lodhaमंगलप्रभात लोढा