शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
2
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
3
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
4
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
5
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
6
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
7
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
8
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
9
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
10
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
11
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
12
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
13
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
14
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

पक्ष्यांचे निवारे धोक्यात

By admin | Published: May 20, 2016 2:35 AM

विकासकामांमुळे काही ठिकाणी पर्यावरणाची हानी होत असून, नदीकाठच्या पक्ष्यांचे निवारे उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली

देहूगाव : वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा जगाला संदेश देणाऱ्या जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराजांच्या श्रीक्षेत्र देहूगावात इंद्रायणी नदीच्या काठावर सुरू असलेल्या विविध विकासकामांमुळे काही ठिकाणी पर्यावरणाची हानी होत असून, नदीकाठच्या पक्ष्यांचे निवारे उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे.इंद्रायणी नदीवर ११२ मीटर रुंद व ७.५ मीटर रुंदीच्या पुलांचे आणि त्यांना जोडणाऱ्या दोन १०० फूट रस्त्याचे कामदेखील सुरू आहे. आणखी एका पुलाचे बांधकाम प्रस्तावित आहे. वारकऱ्यांची सोय, पूर नियंत्रण आणि नदीचे सौंदर्य वाढावे, यासाठी पूर्व किनाऱ्यावर घाट बांधण्यात येत आहे. याच घाटाला लागूनच स्मशानभूमी व उर्वरित घाटाचे बांधकाम करण्यात येणार आहे. मात्र, हे काम करताना किनाऱ्यावरील करंज व इतर जंगली झाडे यांची काही अंशी कत्तल करावी लागली. या झाडांवर पक्ष्याची ती घरटी होती. दररोज सकाळी सहाच्या सुमारास व सायंकाळी किंवा कातरवेळी या पक्ष्यांचे थवे आकाशात झेपावत दिसत असत. वृक्षतोडीमुळे पक्ष्यांचे निवारेच नष्ट होण्याची भीती निसर्गप्रेमी व्यक्त करीत आहे.देहूगावामध्ये डीजे बंदीचा ठराव होऊनही मोठ्या आवाजाचे डीजे वाजविले जातात. फटाक्यांच्या आतषबाजीमुळेही येथील शांततेचा भंग होत असून, या पक्ष्याच्या निवाऱ्यांवर परिणामी होत असल्याचे जाणवत आहे. श्री संत तुकाराममहाराजांच्या गाथा याच परिसरात बुडविल्या असल्याने या परिसराला मोठा इतिहास आहे. शांत जागा म्हणूनही ही जागा प्रसिद्ध होती. मात्र, अलीकडे या भागातील शांतताच हरवली आहे. (वार्ताहर)झाडांची कत्तल होत आहे. त्याचप्रमाणे लग्नसराईमुळे फटाक्यांच्या आवाजाच्या ध्वनिप्रदूषणामुळे येथील पक्ष्याचे जीवन धोक्यात आले आहे. सायंकाळी नदीच्या किनाऱ्यावरील वृक्षावर विसावणाऱ्या पक्ष्यांच्या थव्यांचे दृश्य आता दुर्मीळ होऊ लागले आहे. नदीकाठावरील वृक्षवल्लीला घरघर लागलेली दिसत आहे.विकास तर झालाच पाहिजे, परंतु त्याचबरोबर संत तुकाराममहाराजांनी चारशे वर्षांपूर्वी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या अभंगातून वृक्ष आणि वनचरांचे महत्त्व सांगितले आहे, हे लक्षात घेऊन या पक्ष्यांचे जीवन वाचवावे व वृक्षांचे पुनर्रोपण किंवा नव्याने वृक्षारोपण करावे, अशी मागणी येथील निसर्गप्रेमींकडून होत आहे.