शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
2
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
3
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
4
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
5
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
6
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
7
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
8
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
9
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
10
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
11
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
12
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
13
‘लाडकी बहीण’ योजनेत पुन्हा गैरप्रकार समोर; ६ लाडक्या भावांचे अर्ज, ‘असा’ लागला शोध
14
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
15
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
16
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
17
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली
18
“ब्रिजभूषण सिंहचा एन्काउंटर का केला नाही, RSSच्या लोकांना वाचवायला अक्षय शिंदेला संपवले”
19
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
20
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

पक्षी ठरले दिवाळीच्या फटाक्यांचे बळी

By admin | Published: November 15, 2015 2:18 AM

प्रकाशाचा उत्सव असलेल्या दीपावलीत फटाक्यांमुळे हवा व ध्वनिप्रदूषणाबरोबरच पक्ष्यांनाही अपाय होतो. यंदाही दिवाळीत आतषबाजीमुळे शेकडो पक्ष्यांना जीव गमवावा लागल्याचे

अझहर शेख,  नाशिकप्रकाशाचा उत्सव असलेल्या दीपावलीत फटाक्यांमुळे हवा व ध्वनिप्रदूषणाबरोबरच पक्ष्यांनाही अपाय होतो. यंदाही दिवाळीत आतषबाजीमुळे शेकडो पक्ष्यांना जीव गमवावा लागल्याचे पर्यावरणप्रेमींच्या निरीक्षणातून समोर आले आहे. सण-उत्सव साजरे करताना सजीवसृष्टीला अपायकारक ठरणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यातूनच अनेक पर्यावरणप्रेमींनी मकर संक्रांतीच्या वेळी पतंगोत्सवासाठी नायलॉन बंदीसाठी विविध स्तरांवर केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. तरीही छुप्या पद्धतीने वापरण्यात येणाऱ्या मांज्यामुळे पक्षी जायबंदी होतात. आताही दिवाळीत फटाक्यांच्या धूमधडाक्यामुळे पक्ष्यांना अपाय होतात. दीपावलीचा उत्सव सुरू झाला की, फटाक्यांचे आवाज आणि त्याद्वारे होणारे वायुप्रदूषण पक्ष्यांच्या जीवावर बेतणारे ठरते. पक्ष्यांचा अधिवास असलेल्या झाडांच्या परिसरात अचानकपणे फटाके फुटू लागताच, पक्षी बिथरतात आणि घबराटीने काही मृत्युमुखी पडतात. काही आवाजापासून लांब जाण्यासाठी रात्रीच्या अंधाराची पर्वा न करता भरारी घेतात. मात्र, त्यांची ही भरारीदेखील जीवघेणी ठरते. अडथळ्यांवर आपटून पक्षी जमिनीवर कोसळतात. दरवर्षी दिवाळीच्या काळात मोठ्या संख्येने पक्षी बेघर होतात. क्षणभराचा फटाक्यांचा आनंद अनेक पक्ष्यांसाठी कर्दनकाळ ठरतो. नाशिकमध्ये अनेक संस्था व पक्षीप्रेमींनी सोशल मीडियाबरोबरच फटाक्यांच्या विरोधात व्यापक मोहीम सुरू केली आहे. वाढती मानवी वस्ती व शाश्वत विकास संकल्पना अंमलात न आणता केली जाणारी विकासकामे, यामुळे पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास शहर परिसरातून जवळपास संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. वड, पिंपळ, नांद्रुक, करंज, उंबर, कडुनिंब, चिंच यांसारखे पर्यावरणपूरक व जैवविविधता जोपासणारे आणि अन्न, निवारा या गरजा भागविणाऱ्या वृक्षांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. त्यामुळे पक्ष्यांचे अस्तित्वही धोक्यात येत आहे. त्यातच सण-उत्सवांचे बदलते स्वरूप पक्ष्यांच्या मुळावर आले आहे.तीन दिवसांपूर्वीच जखमी अवस्थेतील कोकिळेला सोडविण्यात आले. धनत्रयोदशीपासून तुलसी विवाहापर्यंत जखमी पक्ष्यांच्या ‘रेस्क्यू’चे कॉल दिवाळीमध्ये दरवर्षी येतात. फटाक्यांमुळे पक्षी व पर्यावरणाची अपरिमित हानी होते.- शेखर गायकवाड, पक्षिमित्र