शहरं
Join us  
Trending Stories
1
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
2
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...
3
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'सांगोला'मध्ये ठाकरेंविरोधात पुन्हा 'सांगली पॅटर्न'?
4
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणी दिवाळी बोनसपासून मुकणार? निवडणूक आयोगाने योजना रोखली
5
IND vs NZ : भारताने ५४ धावांत ७ गडी गमावले; सुवर्णसंधी हुकली, विजयासाठी न्यूझीलंडसमोर खूप सोपे आव्हान
6
महाविकास आघाडीला झटका! अखिलेश यादवांनी चार उमेदवार केले जाहीर
7
झारखंडमध्ये निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; पोलीस महासंचालकांना हटविले
8
माढ्यात तुतारीबाबतचा संभ्रम कायम; चार इच्छुक शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्यानंतर काय घडलं? 
9
"प्रत्यार्पण करण्यास नकार दिला तर..."; शेख हसीना प्रकरणात बांगलादेशचा भारताला इशारा
10
Scorpio पेक्षा महागडी आहे 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत पाहून तुमचा विश्वास बसणार नाही
11
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरणार?; चर्चा रंगल्यानंतर अशोक चव्हाणांचा खुलासा
12
"राणा हे आमदार नव्हे, तर सावकार आहेत", रवी राणांवर भाजपच्या तुषार भारतीयांचा हल्लाबोल
13
२० हून अधिक विमानांना धमकी, सुरक्षा यंत्रणा सतर्क; जयपूरमध्ये एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
14
गौरवास्पद! विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
15
IND vs NZ : टीम इंडियानं ३५६ धावांची पिछाडी भरून काढत रचला खास रेकॉर्ड; आता...
16
Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीचा मुंबईतल्या जागांचा फॉर्म्युला ठरला; अजित पवार गटाला ३ जागा तर भाजपा, शिवसेनेला...
17
आटपाडीच्या ओढ्याला ५०० च्या जुन्या-नव्या नोटांचा पूर आला; नागरिकांनी लुटल्या लाखोंच्या नोटा
18
जाहीर सभेत राहुल गांधींबद्दल अपमानास्पद वक्तव्य, भाजप आमदारावर गुन्हा दाखल
19
Karva Chauth 2024: द्रौपदीनेही पांडवांसाठी केले होते करवा चौथ व्रत; वाचा व्रताचे महाभारत कनेक्शन!
20
डिसेंबरमध्येही कार-होम लोन स्वस्त होणार का? RBI गव्हर्नरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...

भाजपा-सेना सरकार अपयशी

By admin | Published: May 08, 2016 2:21 AM

दुष्काळाचे अनिष्ट चक्र भेदण्यासाठी दीर्घकालीन तसेच तातडीच्या उपाययोजना हाती घेणे गरजेचे आहे. परंतु, भाजपा-शिवसेना युतीकडून प्रत्यक्षात कुठलीही कामे होताना दिसत नाहीत

उस्मानाबाद : दुष्काळाचे अनिष्ट चक्र भेदण्यासाठी दीर्घकालीन तसेच तातडीच्या उपाययोजना हाती घेणे गरजेचे आहे. परंतु, भाजपा-शिवसेना युतीकडून प्रत्यक्षात कुठलीही कामे होताना दिसत नाहीत. हे शासन केवळ घोषणाबाज असून सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी येथे केली.जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांतील शेतकऱ्यांशी चव्हाण यांनी संवाद साधला. त्यानंतर येथील सर्किट हाऊसमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली. चव्हाण म्हणाले, कृषी कर्जाचे पुनर्गठन करण्यास शेतकरी उत्सुक नाहीत. सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांमध्ये कर्ज फेडण्याची ऐपत राहिलेली नाही. त्यामुळे शासनाने कर्जाचे पुनर्गठन करण्याऐवजी कर्जमाफी द्यावी. खरीप हंगाम तोंडावर आला आहे. मात्र, पेरणीसाठी लागणारे बी-बियाणे व खत खरेदी करण्यापुरतीही कुवत शेतकऱ्यांत नाही. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना विनामूल्य बियाणे व खताचा पुरवठा करावा.अधिकारी ऐकत नाहीत, असे खुद्द मुख्यमंत्रीच सांगत असतील तर जनतेने दाद कोणाकडे मागायची? जर अधिकारी ऐकत नसतील, त्यांना घरचा रस्ता का दाखवित नाहीत, असा सवाल चव्हाण यांनी केला. (प्रतिनिधी)अनुदानातून १०० रुपयांची कपातजिल्हा बँकेकडून निराधारांच्या अनुदानातून प्रत्येकी शंभर रूपये कपात केले जात आहेत. बँकेची ही कृती चुकीची असल्याचे सांगत हे पैसे कोणाच्या खिश्यात जातात?, असे चव्हाण यांनी विचारले. सरकार पावसाची वाट बघतेयदिवसागणिक दुष्काळी परिस्थिती अधिक तीव्र स्वरूप धारण करीत आहे. त्यामुळे कर्जमाफीसोबतच अन्य उपाययोजना हाती घेणे गरजेचे आहे. परंतु, हे शासन पाऊस कधी पडेल त्याची वाट बघत आहे. पाऊस पडला की शेतकरी सर्व विसरतील, असे शासनकर्त्यांना वाटत असल्याचे चव्हाण म्हणाले.