शहरं
Join us  
Trending Stories
1
खेकड्यांनी धरण पोखरलेले, उंदरांनी दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे; गाड्या हवेत उडू लागल्या
2
“...तरच मी माझे शब्द मागे घेईन”; संजय गायकवाड यांनी राहुल गांधींसमोर ठेवली मोठी अट
3
आतिशी २१ सप्टेंबरला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, उपराज्यपालांकडून सरकार स्थापनेचं निमंत्रण
4
SL vs NZ : WHAT A TALENT! शतकांची मालिका सुरुच; श्रीलंकेच्या खेळाडूसमोर सगळ्यांचीच 'कसोटी'
5
"सर्वात भयंकर म्हणजे पंतप्रधान-गृहमंत्र्यांनी याला भडकावणे", प्रियंका गांधी का संतापल्या?
6
"बाळासाहेब असते, तर तुम्हाला उलटे टांगले असते", बोरनारेंचा उद्धव ठाकरेंवर वार
7
अयोध्येतील राम मंदिरावर आतापर्यंत २५०० कोटींचा खर्च; सरकारला मिळणार इतक्या कोटींचा GST!
8
मोदी सरकारचा मोठा निर्णय; 'वन नेशन वन इलेक्शन' प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी
9
५०० रुपयांत गॅस सिलिंडर, मोफत उपचार... हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध, कोणासाठी काय-काय?
10
जगातील अनेक देशांमध्ये 'वन नेशन वन इलेक्शन'चा फॉर्म्युला लागू, अशी आहे प्रक्रिया...
11
रोहित शर्माची मुलाखत घेताना पहिला प्रश्न कुठला विचारशील? विराट कोहलीने दिलं मजेशीर उत्तर
12
Bigg Boss Marathi Season 5: निक्कीसोबत मैत्री? वैभव चव्हाण म्हणाला, 'तोंडावर सांगतो तिच्याशी माझी कधीच..."
13
राज्याला महिला CM मिळेल? सुप्रिया सुळे-रश्मी ठाकरेंचे नाव चर्चेत? काँग्रेस खासदार म्हणतात...
14
“राहुल गांधींच्या जीवाला धोका, रणनीती आखली जाते, केंद्रीय गृहमंत्री...”; राऊतांचा मोठा आरोप
15
४ वर्ष IPL च्या मैदानात! बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची क्रिकेटमधून बंपर कमाई
16
Vastu Shastra: मीठ मोहरीने केवळ व्यक्तीचीच नाही तर वास्तुचीही दृष्ट काढता येते; वाचा वास्तु टिप्स!
17
BSEच्या शेअरमध्ये 'बुल रन'; दिवसभरात १५% पेक्षा अधिक वाढ; NSE IPO शी काय आहे कनेक्शन?
18
सुखी, समाधानी, समृद्ध जीवन हवे? पाहा, स्वामी समर्थ अन् शंकर महाराजांची प्रभावी वचने
19
...अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल
20
राजकीय स्टेटमेंट करणार नाही असे म्हणत जरांगेंचे पुन्हा फडणवीसांवर आरोप; काय म्हणाले...

“२०१७ मध्येच फडणवीसांनी सगेसोयरे कायदा केला, पण मराठा मुख्यमंत्र्यांनी प्रश्न सोडवला नाही”

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 8:06 PM

BJP Chandrakant Patil News: शरद पवार चारवेळा मुख्यमंत्री होते. परंतु, यासंदर्भात काही केले नाही. देवेंद्र फडणवीसांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याचा राग त्यांच्या मनात आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

BJP Chandrakant Patil News: आतापर्यंत मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री झाले. शरद पवार हे तर चार वेळा मुख्यमंत्री होते. देवेंद्र फडणवीस संपूर्ण पाच वर्ष मुख्यमंत्री राहिले, हीच बाब शरद पवारांना जास्त खटकते. तोच राग आहे. परंतु, इतके मराठा मुख्यमंत्री होऊनही मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न कोणीही केला नाही. महाराष्ट्रातील ३८२ जाती मंडल आयोगाने शोधून काढल्या, कुणबीही त्यात आहेत. कुणबी हे मराठा आहेत की, नाही हे कोणीही शोधण्याचे प्रयत्न केले नाही. कुठल्याही मराठा मुख्यमंत्र्यांनी हे केले नाही. कुठल्याही मराठा मुख्यमंत्र्यांनी मराठा जात ओबीसी यादीत टाकायला हरकत नव्हती, पण तसे कोणीही केले नाही, असा दावा भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी केला. 

भाजपाचे बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. हैदराबाद गॅझेट लागू करणे तसेच एक दिवसाचे अधिवेशन घ्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. यावर,  विशेष अधिवेशन बोलवण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो ते पत्र मुख्यमंत्री यांनी राज्यपाल यांना पाठवायचे असते. तुमची ही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपर्यंत पोहोचवतो. शासनाचा प्रतिनिधी म्हणून जसा आलो आहे, तसा विद्यार्थी दशेत काम करणारा मित्र म्हणून तुम्हाला भेटायला आलो आहे, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केले. 

२०१७ मध्येच देवेंद्र फडणवीसांनी सगेसोयरे कायदा केला

रक्तसंबंध सगेसोयरे याचा अर्थ मला आरक्षण मिळाले तर माझ्या मुलांना आपोआप मिळणार यालाच सगेसोयरे म्हणतात. आईकडून येणारे रक्तसंबंध सर्वोच्च न्यायालय मान्य करत नाही. सगेसोयरेचा कायदा २०१७ मध्येच लागू झाला आहे. हा कायदा देवेंद्र फडणवीसांनी तेव्हाच केला आहे. सरसकट मराठ्यांना कुणबी म्हटले की, ते न्यायालयात जाईल, टिकेल की नाही, ते आता माहिती नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, दुसरी मागणी ओबीसीतून आरक्षण द्यावे अशी आहे. १९०२ मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी मराठा आरक्षण द्यायचा निर्णय घेतला. मराठा समाज गरीब आणि शेतीवर अवलंबून असल्याने त्यावेळी आरक्षण दिले. स्वातंत्र्य मिळेपर्यंत हे आरक्षण होते, त्यानंतर घटनात्मक आणि कायदेशीर असे दोन पद्धतीने आरक्षण राहिले. घटनात्मकमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीला आरक्षण देण्यात आले. नंदुरबारमध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षण आहे, कारण तिथे एसटी, एसटी जास्त आहेत. त्यामुळे जिथे एसटी, एससी जास्त असतील तर पन्नास टक्के अट ओलांडल्यास चालते, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Reservationमराठा आरक्षण