भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP Chandrasekhar Bawankule) यांनी राष्ट्रवादी (NCP), काँग्रेस (Congress) आणि शिवसेनेवर (Shivsena) जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाही खोचक टोला लगावला आहे. "भविष्यात धक्केच्या धक्के बसतील, बॉम्बस्फोटही दिसतील" असा सूचक इशाराही बावनकुळेंनी दिला आहे. तसेच "उद्धव ठाकरे मंत्रालयात 18 महिने आलेच नाहीत. त्यामुळे कोणत्या समित्या नाहीत, काम नाही. एकट्या राष्ट्रवादीने संपूर्ण सरकार लुटलं" असं म्हणत निशाणा साधला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही बोचरी टीका केली आहे. "राष्ट्रवादीमध्ये काही लोकांचं भलं झालं. जे 50 प्रमुख नेते आहेत तेवढ्याच लोकांचं भलं झालं. खालच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे" असं म्हटलं आहे. तसेच "काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये, उद्धवजींकडे शिल्लक असलेले कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश घेत आहेत. उद्धव ठाकरे मंत्रालयात 18 महिने आलेच नाहीत. त्यामुळे कोणत्या समित्या नाहीत, काम नाहीत. एकट्या राष्ट्रवादीने संपूर्ण सरकार लुटलं असा आक्षेप हा काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा आहे. त्यामुळे प्रचंड नाराजी आहे."
"राष्ट्रवादीमध्ये सुद्धा काही लोकांचं भलं झालं. जे 50 प्रमुख नेते आहेत तेवढ्याच लोकांचं भलं झालं. खालच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. मविआमधील कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आहे. भविष्यात धक्केच्या धक्के बसतील, बॉम्बस्फोटही दिसतील... जसं जसं 2024 जवळ येईल" असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. बावनकुळे यांनी आधी देखील विविध मुद्द्यांवरून शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.