शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अजित पवारांचा जयंत पाटलांना धक्का! सांगलीत 'घड्याळ' चिन्हावर दोन उमेदवार उतरवणार
2
सहा मतांनी आमदार... १००च्या आतील मतफरकाने आजवर १२ जणांनी जिंकली विधानसभा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांनी ११ नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवलं; होणार मोठी लढत
4
आजचे राशीभविष्य : स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल, धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल
5
शनी मार्गी: ७ राशींची दिवाळीनंतरही दिवाळी, व्यवसायात नफा; उधारी वसूल होईल, बँक बॅलन्स वाढेल!
6
पुण्यातील त्रिकुटाला दिली होती बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी; पैशांच्या वादातून नाकारले काम
7
सरकारी निर्णयांवर आयोगाचा असेल ‘वॉच’; मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती
8
विकास हवा, नको नुसता बोभाटा; नाही तर आहेच ‘नोटा’; गेल्यावेळी हा पर्याय होता दुसऱ्या स्थानी
9
फक्त विक्री आणि विक्री... शेअर बाजाराला कोणाची नजर लागली; कोरोनानंतर मोठी निराशा, काय आहे इशारा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : पाच वर्षांत आदित्य ठाकरेंच्या संपत्तीत ४ कोटींची वाढ
11
ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड
12
आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांचे महायुतीविरुद्ध आंदोलन; प्रचार करणार की नाही?
13
मुंबईत काँग्रेसचे ४ अल्पसंख्याक उमेदवार; पहिल्या यादीत अस्लम शेख, अमीन पटेल आदींची नावे
14
मंगल प्रभात लोढा यांची संपत्ती ४३६ कोटी! पाच वर्षांत ठाकरे, आव्हाडांची संपत्ती कितीने वाढली?
15
बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका-पुतण्या लढत; गडचिरोलीत वडील विरुद्ध मुलगी
16
बडे नेते, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्वांनीच केले शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी साधला मुहूर्त
17
एलओसीजवळ दहशतवादी हल्ला, दाेन जवान शहीद; जम्मूत पुन्हा भ्याड कृत्य; दाेन हमालही ठार
18
महायुतीत २७८ जागांवर ठरले; आता १० जागांचाच तिढा! अमित शाहांसोबतच्या बैठकीत निर्णय
19
काँग्रेसने २५ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी; ४८ जणांची पहिली यादी जाहीर
20
घड्याळ वापरा, पण अटही पाळा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या

Maharashtra Politics: “आधी १८ महिने मंत्रालयाने मुख्यमंत्री पाहिले नव्हते, आता १८ तास शिंदे-फडणवीस काम करतात”

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2023 2:38 PM

Maharashtra News: एक काळ होता की, फक्त जेव्हा फेसबुकवर सरकार चालू होते. मात्र, आता जनतेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहणारे सरकार सत्तेत आले आहे, असे भाजप नेत्याने म्हटले आहे.

Maharashtra Politics: आताच्या घडीला राज्यात अनेकविध विषयांवरून राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. तर, दुसरीकडे आगामी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जय्यत तयारी सुरू केली असून, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. तसेच राज्यातील भाजप नेतेही अनेक ठिकाणी जाऊन गाठीभेटी घेत आहेत. यातच आता भाजपकडून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात आली आहे. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शिंदे-फडणवीस सरकारचे कौतुक करताना उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात सरकार १८ तास काम करते. एक काळ होता की, फक्त जेव्हा फेसबुकवर सरकार चालू होते. १८ महिने मंत्रालयाने मुख्यमंत्री पाहिले नव्हते, अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. एकीकडे डबल इंजिन सरकार आणि दुसरीकडे संघटनात्मक बांधणी सुरू आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे जनतेचे सरकार आहे. लोकांची कामे केली जात आहेत. मागच्या सरकारमध्ये फोडाफोडी करून सरपंच केले जात होते. आता थेट सरपंचपदाचा निर्णय घेताच भाजप आणि शिंदे गटाचे सरपंच निवडून आले, असे बावनकुळे यांनी सांगितले.

जिथे शिंदेंचे उमेदवार असतील तिथे आम्ही ताकदीने मदत करू

आमदारांच्या पत्रांवरही मुख्यमंत्री सह्या करत नव्हते. निर्णयांमध्ये सुसूत्रता नव्हती. दहीहंडीसाठी कोरोना होता, पण आयपीएलसाठी नव्हता. नागपूर अधिवेशनासाठी कोरोना होता, असेही सरकार महाराष्ट्राने पाहिले आहे. आता मात्र जनतेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहणारे सरकार सत्तेत आले आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले. तसेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेपासून ग्रामपंचायतीपर्यंत महाराष्ट्रातली प्रत्येक निवडणूक आम्ही एकत्र लढू आणि जिंकूही. जिथे शिंदेंचे उमेदवार असतील तिथे आम्ही ताकदीने मदत करू. जिथे भाजपचे उमेदवार असतील तिथे शिंदे गट आमच्या पाठिशी उभा असेल, अशी ग्वाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

दरम्यान, राज्याचा ८० टक्के दौरा पूर्ण झाला आहे. जानेवारी अखेरपर्यंत उर्वरित दौरा पूर्ण होईल. आत्तापर्यंत ४५ जिल्ह्यांचा प्रवास केला. राज्यात २५ लाख युवा वॉरिअर्स काम करणार आहेत. महाराष्ट्रात केंद्राचे ७ कोटी लाभार्थी असून त्यापैकी २ कोटी लाभार्थी पंतप्रधान मोदी यांना धन्यवाद म्हणून पत्र देणार आहेत. आत्तापर्यंत ३५ लाख महिलांनी पत्रे दिली आहेत, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस