शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

“आता ठाकरेंच्या उमेदवारांना कोणी मत देणार नाही, उद्धवसेनेतील अनेक जण भाजपात येण्यास इच्छूक”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 17:29 IST

BJP Chandrashekhar Bawankule News: वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरील भूमिकेवरून ठाकरेंकडील हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते पक्ष सोडून जाण्याच्या मानसिकतेत असून, आगामी काही दिवसांत अनेक जण भाजपात प्रवेश करून शकतात, असा दावा करण्यात आला आहे.

BJP Chandrashekhar Bawankule News: बुधवारचा दिवस वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून चांगलाच गाजला. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी केवळ यावर राजकीय मते व्यक्त केली नाही, तर सुधारणा विधेयकावर लोकसभेत विस्तृत चर्चा झाली. दोन्ही बाजूच्या सदस्यांनी आपापले म्हणणे मांडले. वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत दीर्घ चर्चेनंतर मध्यरात्री मतदानाने पारित करण्यात आले. या विधेयकाच्या बाजूने २८८ तर विरोधात २३२ एवढी मते पडली. यानंतर आता उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर भाजपा नेत्यांकडून उद्धव ठाकरेंवर पलटवार केला जात आहे. 

जर हिंदूत्ववादी असाल तर भाजपाने त्यांच्या झेंड्यावरील हिरवा रंग काढावा. फटाक्यांची वात पेटवायची आणि पळून जायचे ही भाजपाची वृत्ती आहे. त्याला आम्ही विरोध केला. वक्फच्या जमिनी बळकावून त्यांच्या व्यापारी मित्रांना दिल्या जाणार त्याचा आम्ही विरोध केला आहे. भाजपाचे नेते अमित शाह, किरेन रिजिजू, टीडीपी, जेडीयू यांनी ज्याप्रकारे मुस्लीम समाजाची भूमिका मांडली. गरीब मुस्लिमांसाठी हे विधेयक आणले. मराठीत त्याला लांगुनचालन म्हणतात तेच तुम्ही करत होता. तोडा, फोडा आणि राज्य करा ही भाजपाचे धोरण आहे. वक्फ सुधारणा विधेयक जर मुस्लिमांच्या हिताचे आहे तर हिंदुत्व आम्ही सोडले की तुम्ही सोडले? उद्या हिंदू देवस्थानावर गैर हिंदू लादला तर ते आम्ही सहन करू का? तर नाही. तसेच वक्फ बोर्डावर गैर मुस्लीम ते कसे सहन करतील, असे सांगत उद्धव ठाकरेंनी टीका केली. याला भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

आता ठाकरेंच्या उमेदवारांना कोणी मत देणार नाही

पत्रकारांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे व त्यांच्या खासदारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे पक्षातील कार्यकर्ते व शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता आहे. त्यांच्या खासदारांनी वक्फ सुधारणा विधेयकाचा विरोध करून महाराष्ट्राचा व देशाचा अपमान केला आहे. त्यामुळे जनता उद्धव ठाकरेंना माफ करणार नाही. ज्या लोकांनी त्यांचे खासदार निवडून दिले त्यांना आता वाईट वाटत असेल की, आता आपली चूक झाली, आपण उगाच उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला मतदान केले. त्यामुळे जनता आता उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांना निवडून देणार नाही. कारण त्यांनी वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध केला आहे, असा दावा बावनकुळे यांनी केला. 

ठाकरेंकडील हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते पक्ष सोडून जाण्याच्या मानसिकतेत

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार उद्धव ठाकरे यांनी सोडले आहेत. त्यांनी काँग्रेसचे विचार मान्य केल्याचा हा आणखी एक पुरावा आहे. मतांसाठी ते काही लोकांचे लांगुलचालन करत आहेत. मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून, विशिष्ट समाजाचा विचार करून त्यांच्या खासदारांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते, त्यांचे शिवसैनिक शिवसेना सोडून जाण्याच्या मानसिकतेत आहेत. त्यासंदर्भात मला कालपासून फोन येत आहेत. आजही अनेक मेसेज आले आहेत. मला भाजपात पक्ष प्रवेश घ्यायचा आहे अशी विचारणा होत आहे. आगामी काळात अनेक जण पक्षप्रवेश करू शकतात, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. 

 

 

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा