शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

“२०२४ ला नरेंद्र मोदी तिसऱ्यांना पंतप्रधानपदाची शपथ घेतील”; चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 16:37 IST

Chandrashekhar Bawankule News: पंकजा मुंडे यांच्या रक्तात भाजप असून, त्या नाराज नाहीत, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

Chandrashekhar Bawankule News: लोकसभेच्या कामासाठी आलो आहे. सुपर वॉरियर्स लोकांच्या घरी जाऊन पंतप्रधान मोदींचे कार्य समजावून सांगतील. ज्यांना योजनांचा लाभ मिळाला नाही त्यांना योजनेचा लाभ कसा देता येईल ते बघणार आहोत. सन २०२४ मध्ये नरेंद्र मोदी तिसऱ्या वेळा पंतप्रधान पदाची शपथ घेतील. तसेच राज्यात महायुतीचे ४५ प्लस खासदार निवडून येतील, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने तयारी सुरू केली असून, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राज्यातील अनेक ठिकाणी दौरे करत आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मकाऊ भेटीवरून संजय राऊतांनी टीका आणि आरोप केले. यावर बोलताना, वैयक्तिक जीवनात बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एका फोटोमुळे कुणाची इमेज खराब करता येते असे एखाद्याला वाटत असेल तर ते शक्य नाही. हाँगकाँगला परिवारासोबत गेलो होतो. त्या ठिकाणी प्रत्येक हॉटेलमध्ये कॅसिनो असतो, त्याला क्रॉस करून जाताना कुणीतरी तो फोटो काढला, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. 

पंकजा मुंडे कुठेही नाराज नाहीत

गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. यावर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. पंकजाताई मुंडे कुठेही नाराज नाहीत. पंकजा मुडे यांच्या नेतृत्वाला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांच्या नाराजीने विरोधकांचा काही फायदा होईल असे अनेकांना वाटते. पण पंकजाताईंच्या रक्तारक्तात भाजप आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या कर्तृत्वाने उभा राहिलेला महाराष्ट्रात पंकजाताई कधीही नाराज राहू शकत नाहीत. खरे तर पक्ष मोठा आहे. पंकजाताई पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहेत. निश्चितपणे पंकजा ताई महाराष्ट्रात आणि देशात चांगल्या लेव्हलला नेतृत्व करतील अशी अपेक्षा आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टपणे सांगितले. 

दरम्यान, वाचळवीरांनी औकतीत बोलावे, महाराष्ट्र संस्कारमय आहे, देव, देश, धर्म संस्कृती जपणारा आहे. इतर काही बोलण्यापेक्षा राज्याच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्यासाठी बोलले पाहिजे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. तसेच ५२७ वर्षांपासून राम मंदिराची वाट पाहिली जात आहे. ते स्वप्न पूर्ण झाले. मुस्लिम माहिलाही भाजपला मतदान करणार आहेत. याचे कारण त्यांचा संसार वाचवण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले आहे. महिला आनंदी आहेत, नवीन संसद भावनात पहिला कायदा महिलांना आरक्षण देण्याचे काम केले, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 

 

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेPankaja Mundeपंकजा मुंडे