शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

‘जलयुक्त शिवार योजने’वरून भाजपा, काँग्रेसमध्ये जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 05:17 IST

जलयुक्त शिवार योजना राबवूनही नोव्हेंबर महिन्यात राज्यात टँकरच्या संख्येत झालेली वाढ चक्रावून टाकणारी आहे. यामुळे या योजनेचे पितळ उघडे पडल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते आणि सरचिटणीस सचिन सावंत यांनी केला.

मुंबई : जलयुक्त शिवार योजना राबवूनही नोव्हेंबर महिन्यात राज्यात टँकरच्या संख्येत झालेली वाढ चक्रावून टाकणारी आहे. यामुळे या योजनेचे पितळ उघडे पडल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते आणि सरचिटणीस सचिन सावंत यांनी केला. त्यावर भाजपाकडून तत्काळ खुलासा करण्यात आला. सावंत यांनी मे अखेरची आकडेवारी घेतली असती, तर त्यांच्याच सरकारचे पितळ उघडे पडले असते, असा टोला भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लगावला. त्यावर मे २०१८ मध्ये १,६२२ टँकर लावल्याची आकडेवारी सावंत यांनी बुधवारी जाहीर केली.भाजपाच्या अकार्यक्षम, भ्रष्टाचारी कारभारावर बोट ठेवल्यामुळे भाजपाचे प्रवक्ते खोटे आकडे देत आहेत. नोव्हेंबर महिन्यातील आकडेवारी दाखविता येत नाही, हे पाहून मे महिन्यातील आकडेवारी दाखविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला जात आहे, असा आरोप सावंत यांनी केला.२०१३ मध्ये १०९ टक्के पाऊस पडून २,३२२ टँकर, तर २०१४ मध्ये ७० टक्के पावसात २,३५८ टँकर होते. टँकर लॉबी काँग्रसने पोसली होती, असा आरोप करून केशव उपाध्ये म्हणाले, युती सरकारच्या काळात मे २०१६च्या अखेरीस ९५ टक्के पाऊस पडूनही १,३४३ टँकर होते. त्यावर सावंत यांनी ३० मे २०१६ रोजी राज्यात ५,९२३ टँकर चालू असल्याची आकडेवारी सरकारच्याच संकेतस्थळावर असल्याचे दाखवून दिले. भाजपाने खरी आकडेवारी दिली असती, तर आमचे समाधान झाले असते. मात्र, भाजपाच्या खुलाशातून खोटेपणा आणि प्रवक्त्यांचे अज्ञान दिसून येते, असे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाJalyukt Shivarजलयुक्त शिवार