शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

Rajya Sabha Election 2022: “घोडेबाजाराची भीती असेल तर शिवसेनेने उमेदवार मागे घेऊन प्रश्न मिटवावा”; भाजपचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 3:00 PM

Rajya Sabha Election 2022: भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून येतील, याची आम्हाला खात्री आहे, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई: आताच्या घडीला राज्यसभा (Rajya Sabha Election 2022) निवडणुकीवरून देशातील राजकारण तापल्याचे दिसत आहे. अनेक नेते राज्यसभा निवडणुकीकडे डोळे लावून बसले होते. मात्र, काहींच्या पदरी निराशा पडल्याचे दिसत आहे. काँग्रेसमधून अशा पद्धतीचे सूर उमटू लागल्याचे सांगितले जात आहे. राज्यातही राज्यसभा निवडणुकीवरून कलगीतुरा रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर घोडेबाजाराचा आरोप केला होता. याला भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर देत, आम्हाला घोडेबाजार करायचा नाही. तुम्हाला घोडेबाजाराची इतकीच भीती असेल, तर तुमचा उमेदवार मागे घेऊन प्रश्नच मिटवून टाका, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. 

भाजपच्या पीयूष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांनी सोमवारी विधानभवनात जाऊन राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी याबाबत स्पष्ट भूमिका मांडली. भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून येतील, याची आम्हाला खात्री आहे. तुम्हाला घोडेबाजाराची भीती वाटत असेल तर तुम्ही उमेदवार मागे घ्या, म्हणजे घोडेबाजार होणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

आमचे तिन्ही उमेदवार महाराष्ट्रातील अन् राजकीयदृष्ट्या सक्रिय

आमचे तिन्ही उमेदवार महाराष्ट्रातील आहेत आणि राजकीयदृष्ट्या सक्रिय आहेत. राज्यातील सत्ताधारी पक्षाचे अनेक आमदार सद्सद्विवेकबुद्धी आम्हाला मतदान करतील. त्यामुळे आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. यावेळी धनंजय महाडिक यांना निवडून कसे आणणार असा सवाल करण्यात आला. यावर, आम्ही राज्यसभा निवडणुकीत तिसरा उमेदवार उतरवला आहे, म्हणजे आम्ही काहीतरी विचार केला असेल. तिसरा उमेदवार कसा निवडून आणणार, याबाबत आम्ही स्ट्रॅटेजी ठरवली आहे. पण त्याबद्दल मीडियात चर्चा करायची नसते, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

दरम्यान, राज्यसभेच्या सहा जागांकरिता १० जूनला होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक आणि  राज्याचे माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीने माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा संधी दिली आहे.  काँग्रेसकडून उत्तर प्रदेशमधील नेते आणि सुप्रसिद्ध उर्दू कवी इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने तिसरा उमेदवार दिल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. कोल्हापूरचे महाडिक यांना तिसरा उमेदवार म्हणून रिंगणात उतरविल्याने राज्यातील राज्यसभा निवडणुकीला वेगळा रंग चढणार आहे.  

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Rautसंजय राऊत