शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
2
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
3
काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ
4
Tarot Card: देवीच्या आशीर्वादाने नवरात्रीचे चैतन्य अनुभवायला सज्ज व्हा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
5
'या' सरकारी कंपनीला १०० कोटी रुपयांची ऑर्डर; Adani समूहासाठी करणार काम
6
महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा
7
Exclusive: दीड वर्षाच्या मुलासोबत कसं केलं शूट? प्रिया बापटने सांगितली 'रात जवां है'च्या सेटवरची धमाल-मस्ती
8
Sarva Pitru Amavasya 2024 : सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करायचे, पण सूर्य ग्रहणामुळे टाळा 'ही' वेळ!
9
निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय?
10
"फायनलपर्यंत कोणती रास जाईल?"; राशीचक्रकार शरद उपाध्येंनी दिलं भन्नाट उत्तर
11
‘वंदे भारत’चा जगात डंका! ३ देशांकडून आग्रही मागणी, ‘या’ वैशिष्ट्यांमुळे ठरते वेगळी
12
मुलानं खरेदी केलं कोट्यवधीचं घड्याळ; मंत्री असलेल्या बापावर आली वाईट वेळ, काय घडलं?
13
"आम्ही योग्य बँकर निवडला नाही..," Paytm च्या फ्लॉप IPO वर शर्मा यांनी सांगितली कुठे झाली चूक
14
ENG vs AUS : ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव हाणून पाडला; इंग्लंडच्या बाजूने निर्णय लागला, इंग्लिस ट्रोल
15
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
16
पितृपक्ष: घरात पुरुष नाही, मग श्राद्ध कुणी करावे? महिलांना आहे का अधिकार? शास्त्र सांगते...
17
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
18
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
19
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
20
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर

Maharashtra Political Crisis: “अपशकून घडला! एकनाथ खडसे निवडून आले अन् महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार गेले”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2022 6:03 PM

Maharashtra Political Crisis: मंदिरात गेले तर प्रसाद संपला आणि बाहेर आले तर चप्पल चोरीला गेली, अशी अवस्था एकनाथ खडसे यांची झाली आहे, अशी टीका करण्यात आली आहे.

जळगाव: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन राज्याचा कारभार चालवायला सुरुवात केली आहे. मात्र, ज्या पद्धतीने सरकार स्थापन झाले आहे, त्यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. आरोप-प्रत्यारोपही मोठ्या प्रमाणात होत आहेत. यातच आता भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नवनिर्वाचित आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना गिरीश महाजन यांनी सोशल मीडियावर व्हायरल होणारे मेसेज, मीम्स यांचा आधार घेत एकनाथ खडसे यांना टोला लगावला आहे. मंदिरात गेले तर प्रसाद संपला आणि बाहेर पडले तर चप्पल चोरीला गेली, अशी अवस्था एकनाथ खडसे यांची झालेली आहे. सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात, मी याला योगायोग म्हणेल. एकनाथ खडसे यांच्यामुळेच हा अपशकून घडला, असे अजिबात म्हणणार नाही, असे गिरीश महाजन यांनी सांगितले. 

राजकारणात सत्ताबदल हा चालूच असतो

सोशल मीडियावर असे म्हटले जात आहे. पण हा योगायोग असतो. राजकारणात सत्ताबदल हा चालूच असतो, असे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह ३८ हून अधिक आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेत मोठा भूकंप झाला. राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. शिंदे गट आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची नामुष्की ओढावली. तत्पूर्वी, विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेले उमेदवार एकनाथ खडसे यांचा विजय झाला. परंतु, महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यामुळे खडसे यांना पुन्हा एकदा विरोधी पक्षात बसावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी खडसेंविरोधात खोचक टीका केली आहे. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळeknath khadseएकनाथ खडसेEknath Shindeएकनाथ शिंदेGirish Mahajanगिरीश महाजनDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस