शहरं
Join us  
Trending Stories
1
गाढ झोपेत असताना काळाचा घाला! राजस्थानमध्ये लक्झरी बस-टेम्पोमध्ये भीषण अपघात; ८ मुलांसह ११ जणांचा मृत्यू
2
आजचे राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ योग, कामात उत्तम यश; फायद्याचा आनंदी दिवस
3
विधानसभा निवडणूक: जागावाटपावर खलबते! मविआची चर्चा ट्रॅकवर, महायुतीचेही ठरले...
4
Bigg Boss 18 च्या सेटवर सलमान खान भावुक! म्हणाला- "मला इथे यायचं नव्हतं पण..."
5
विशेष लेख: अतुल परचुरे... तो आहे आमच्याबरोबर, आम्ही असेपर्यंत...
6
पिस्तूल, हत्यारे मिळतात तरी कशी? मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षेबाबत वाटू लागली चिंता
7
नववी, दहावी अभ्यासक्रमात ३ विषयांची भर; शेती, नळ दुरुस्ती, बागकाम, सुतारकामाचा समावेश
8
निवडणूक विशेष लेख: कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या; सत्तेची खुर्ची मात्र आम्हालाच द्या..!
9
बोन ऑसिफिकेशन टेस्ट म्हणजे काय? ही चाचणी कशी केली जाते? वाचा सविस्तर
10
संकष्ट चतुर्थी: चंद्रोदयाची वेळ काय? व्रताचरण कसे करावे? पाहा, महत्त्व, मान्यता अन् महात्म्य
11
कार्यालयीन वेळेनंतर चौकशी नाही; मुंबई उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर EDचे परिपत्रक
12
अभ्यासाच्या वह्या, पाण्याचा जार, सायकल स्वस्त होणार; विम्यावर सूट; घड्याळे, बूट महागणार!
13
गजकेसरी पंचराजयोगात संकष्ट चतुर्थी: ५ राशींना यश, सरकारी लाभ; प्राप्तीत वाढ, सर्वोत्तम काळ!
14
७०हून जास्त विमानांत बॉम्बची धमकी; २४ तासांत ३० विमानांचे आपत्कालीन लँडिंग, ८० काेटींचा फटका
15
मरगळलेल्या ‘मरे’ची कूर्मगती; डबा घसरल्याचे कारण, प्रवाशांना घरी पोहोचायला उजाडली पहाट
16
JJ रुग्णालयात गोळीबार करणाऱ्या आरोपीला ३२ वर्षांनी अटक; नाव बदलून दडवली होती ओळख
17
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या भावाला अटक; फसवणुकीच्या एका प्रकरणात कारवाई
18
तळोजा गृहनिर्माण प्रकल्प: बिल्डर टेकचंदानीला मालमत्ता परत करणार; ‘ईडी’ने जारी केली नोटीस
19
मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले पावणे दोन कोटींचे सोने
20
गोपीनाथ मुंडे आज असते, तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं असतं का?; धनंजय मुंडे म्हणाले...

Maharashtra Political Crisis: “शिवसेना खोलात गेलीय, कोणताही टेकू लावा, पक्ष वर येणार नाही”; भाजपचा ठाकरेंवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 4:14 PM

Maharashtra Political Crisis: हिंदुत्वाला विरोध करुन समाजात जातीयवाद पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांसोबत जाऊन उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय मेसेज देणार? अशी विचारणा भाजपने केली आहे.

Maharashtra Political Crisis: राज्यभरातून एकनाथ शिंदे गटाला (Eknath Shinde) वाढता पाठिंबा शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हेदेखील राज्यभर दौरे करत आहेत. शिवसेनेने संभाजी ब्रिगेडशी युती केली असून, यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप अद्यापही शमलेले दिसत नाही. भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली असून, आता कोणताही टेकू लावा, शिवसेना वर येणार नाही, असा मोठा दावा केला आहे. 

संभाजी ब्रिगेडने आजवर स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते विधानसभा, लोकसभा निवडणुकीत समविचारी पक्षांनी घेऊन एकत्र लढण्याचे धोरण अवलंबले आहे. आमची सातत्याने हीच भूमिका राहिली आहे. आतादेखील महाराष्ट्राचे हित जोपासण्यासाठी संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेने एकत्र वाटचाल करण्याचे ठरवले आहे, असे संभाजी ब्रिगेडने युती करताना म्हटले होते. 

उद्धव ठाकरे समाजाला काय मेसेज देणार? 

उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारधारेपासून खूप मोठी फारकत घेतली. आता त्यांना पुन्हा ट्रॅकवर येणे खूप अवघड आहे, असा टोला लगावत ज्या लोकांनी हिंदुत्वाला विरोध केला. ज्या लोकांनी समाजात जातीयवाद पसरविण्याचा प्रयत्न केला, अशा लोकांसोबत जाऊन उद्धव ठाकरे समाजाला काय मेसेज देणार? अशी रोखठोक विचारणाही पडळकर यांनी यावेळी बोलताना केली. तसेच ज्यांना लोकात कोणतीही किंमत नाही, जनाधार नाही, अशा लोकांसोबत ते युती करत आहेत. शिवसेना किती खोलात गेली आहे, हे यावरूनच समोर आले आहे. पण अशा कोणत्याही टेकूने आता शिवसेना वरती येणार नाही, असे सांगत गोपीचंद पडळकर यांनी संभाजी ब्रिगेडसोबतच्या युतीवर शेरेबाजी केली.

दरम्यान, शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र आल्याचा मला आनंद आहे. आपली भूमिका रोखठोक आहे. ती आपल्याला पटली म्हणून आपण एकत्र आलो आहोत. आम्ही सत्तेत होतो, सत्ता पुढे येणारच आहे. काही नसताना तुम्ही सोबत आलेला आहात. ही आपली वैचारिक युती झाली आहे, असे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी केले. या लढवय्या सहकाऱ्यांचे स्वागत करतो. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येऊन आपण मोठा इतिहास घडवू, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला होता. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळGopichand Padalkarगोपीचंद पडळकरUddhav Thackerayउद्धव ठाकरे