शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचे आदित्य ठाकरेंच्या वरळीत तगडे आव्हान; उद्धव ठाकरे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? 
2
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
3
आजचे राशीभविष्य : मित्रांकडून आणि विशेषतः स्त्रीवर्गाकडून लाभ होईल, व्यापारात फायदा होईल
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: यंदाच्या वेळी मुंबईत मराठी मतदारांचा कौल कुणाला?
5
संशयास्पद वाटले तर लगेच जप्ती! निवडणुकीसाठी पालिका आयुक्तांच्या तपास यंत्रणांना सूचना
6
गुरुपुष्यामृत योग: १० राशींना शुभ-लाभ, धनलक्ष्मीची अपार कृपा; अचानक धनलाभ, दिवाळीला भरभराट!
7
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गाेठवले जाणार का? गुरुवारी हाेणार सुनावणी
8
‘भाई विरुद्ध ताई’ युद्धात भाजपच अस्तित्वहीन! बेलापूर मतदारसंघात वेगळाच पेचप्रसंग
9
ठाण्यात उद्या होणार जोरदार शक्तिप्रदर्शन; गुरुपुष्यामृत योग साधत बडे नेते भरणार अर्ज
10
शिंदेसेनेचे ४५ उमेदवार जाहीर; ९ मंत्र्यांना पुन्हा संधी; मुख्यमंत्री कोपरी पाचपाखाडीमधून लढणार
11
मनसेचे ४५ उमेदवार ठरले! मुंबईत १८ तर ठाण्यातून ७ उमेदवार; अमित ठाकरे माहीममधून रिंगणात
12
शेअर बाजार गडगडला! गुंतवणूकदारांचे ९.१९ लाख कोटी रूपये दिवसभरात स्वाहा!
13
शेकापची मोठी खेळी, सहा उमेदवार जाहीर; महाविकास आघाडीत असतानाही जाहीर केली नावे
14
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
15
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
16
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
18
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
19
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
20
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!

Maharashtra Politics: “दुभंगलेली काँग्रेस जोडता येत नाही आणि अभंग भारत जोडायला निघाले आहेत”

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 6:01 PM

Maharashtra News: राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात असून, पुन्हा एकदा भाजपने यावरून टीका केली आहे.

Maharashtra Politics: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या महाराष्ट्रात आहे. या यात्रेला महाराष्ट्रातूनही मोठा पाठिंबा मिळत असल्याचे सांगितले जात आहे. हळूहळू ही यात्रा पुढे जात असून, विविध सभांमधून राहुल गांधी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपच्या धोरणांवर सडकून टीका करताना दिसत आहे. यातच भाजपकडून पुन्हा एकदा भारत जोडो यात्रेवर निशाणा साधण्यात आला आहे. काँग्रेस जोडता येत नाही आणि अभंग भारत जोडायला निघाले आहेत, असा टोला राहुल गांधींना लगावण्यात आला आहे. 

तामिळनाडूतून निघालेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेनंतर मतदारसंघात पक्षाचा झेंडा फडकवण्याची चर्चा होती. यादरम्यान हाणामारीचे प्रकरण समोर आले आहे. टीएनसीसीचे खजिनदार आणि नांगुनेरीचे आमदार रुबी आर मनोहरन यांच्या समर्थकांमध्ये ही हिंसक हाणामारी झाली. टीएनसीसी मुख्यालय सत्यमूर्ती भवन येथे झालेल्या हाणामारीत पक्षाचे किमान चार कार्यकर्ते जखमी झाले आहेत. याच घटनेचा दाखला देत भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर हल्लाबोल केला आहे. 

...आणि अभंग भारत जोडायला निघाले आहेत

अतुल भातखळकर यांनी एक ट्विट केले असून, यामध्ये बातमी तामिळनाडू मधली आहे पण काँग्रेसच्या "भारत जोडो" यात्रेचे पितळ उघडे पाडणारी आहे... तिथे दुभंगलेली काँग्रेस जोडता येत नाही आणि इथे अभंग भारत जोडायला निघाले आहेत, असा टोला अतुल भातखळकर यांनी राहुल गांधींना लगावला आहे. 

दरम्यान, भारत जोडो यात्रेत महागाई, बेरोजगारीसह अर्थव्यवस्थेचा प्रश्नही महत्वाचा मुद्दा आहे. अर्थव्यवस्थेची घसरगुंडी मोदी सरकारला थांबवता येत नाही, जनता महागाईने त्रस्त आहे पण पंतप्रधान मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यावर गप्प आहेत. अर्थव्यवस्थेची स्थिती नाजूक आहे. पण सरकार ते मान्यच करत नाही. दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याच्या वल्गना करणारे आता ७५ हजार नोकऱ्या देत आहेत, ही तरुणांची फसवणूक आहे, अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीAtul Bhatkhalkarअतुल भातखळकर