शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Maharashtra Politics: “सावरकरांचा अपमान सहन न करणाऱ्या बाळासाहेबांचा नातू राहुल गांधीची गळाभेट घेतोय, हे दुर्दैव”

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 15:53 IST

Maharashtra News: भारत तेरे तुकडे होंगे बोलणाऱ्या नेत्यांबरोबर तुम्ही भारत जोडो यात्रा करत आहात. ही नाटके बंद करा, अशी टीका करण्यात आली आहे.

Maharashtra Politics: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या महाराष्ट्रात आहे. राहुल गांधी यांनी कर्नाटकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या विधानाचे पडसाद महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. यावरून आता राहुल गांधींवर हल्लाबोल केला जात आहे. भाजप, शिंदे गट आणि मनसे या प्रकरणी आक्रमक झाले आहेत. तसेच भारत जोडो यात्रेत सहभागी होत राहुल गांधी यांची गळाभेट घेणाऱ्या आदित्य ठाकरेंवर (Aaditya Thackeray) भाजपने निशाणा साधला आहे. 

भाजप नेते आणि आमदार राम कदम यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या विधानावरून राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. श्रीमान राहुल गांधी तुम्ही कधी इतिहासाचा अभ्यास केला आहे का? स्वातंत्रवीर सावरकरांचे बलिदान, त्याग, संघर्ष, त्यांना झालेल्या यातना याबद्दल तुम्ही कधी वाचले आहे का?, ‘भारत जोडो’ यात्रेला देशाने नाकारले. त्यामुळे बातम्यांमध्ये झळकण्यासाठी एका महान क्रांतीकाराबद्दल तुम्ही असे अपशब्द वापरणार का, अशी विचारणा राम कदम यांनी केली आहे. 

ही कशी विचारसरणी आहे?

राम कदम यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी भारत जोडो यात्रेत घेतलेल्या सहभागावरून टीकास्त्र सोडले आहे. सर्वात दुर्देवाची बाब ही आहे की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनीही कधी सावरकरांचा अपमान सहन केला नाही. त्यांचे नातू आदित्य ठाकरे हे सावरकारांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींची गळाभेट घेत आहेत. ही कशी विचारसरणी आहे, असा सवाल करत, भारत तेरे तुकडे होंगे बोलणाऱ्या नेत्यांबरोबर तुम्ही भारत जोडो यात्रा करत आहात. ही नाटके बंद करा, या शब्दांत राम कदम यांनी हल्लाबोल केला. तसेच येणाऱ्या काळात तुम्ही सावरकरांबद्दल अपमान करणाऱ्या शब्दांचा वापर केला आणि सावरकरांच्या भक्तांना चिथावण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या यात्रेचे स्वागत आम्हाला वेगळ्या पद्धतीने करावे लागेल, असा इशाराही राम कदम यांनी दिला. 

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींच्या विधानाशी सहमत नसल्याचे म्हटले आहे. सावरकरांचे देशासाठीचे योगदान अमुल्य आहे. त्यांचा हिंदुत्वाचा विचार काल, आज आणि उद्याही आम्हाला आदरणीय आहे. त्यांच्याबद्दल आमच्या मनात कायम आदरच आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांनी केलेल्या वक्तव्याशी मी सहमत नाही, असे उद्धव ठाकरेंनी नमूद केले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधीAaditya Thackerayआदित्य ठाकरेRam Kadamराम कदम