शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

"तुमचं सरकार बहुमताचं आहे, ते पाडलं जाईल याची एवढी भीती का बाळगता?"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 3:12 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकतीच शिवसेना नेते संजय राऊत यांना एक मुलाखत दिली. यात त्यांनी ऑपरेशन लोटस, असा उल्लेख करत काही भाष्यही केलं होतं. एवढंच नाही तर राऊतांनीही याच मुद्द्यावरून भाजपावर निशाणा साधला होता.

ठळक मुद्देराज्यातील महाविकास आघाडीचं सरकारही पाडलं जाण्याची चर्चा निर्थक - मुनगंटीवारसरकार पाडणं एवढं सोपं असतं तर देशातल नरेंद्र मोदी सरकार विरोधकांनी केव्हाच पाडलं असतं - मुनगंटीवारसरकार पाडणं एवढं सोपं असतं तर देशातल नरेंद्र मोदी सरकार विरोधकांनी केव्हाच पाडलं असतं - मुनगंटीवार

नागपूर - मध्यप्रदेशनंतर आता राजस्थानात सत्ता संघर्ष सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीचं सरकारही पाडलं जाण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, या चर्चेला काहीही अर्थ नाही. असं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही, तर आघाडी सरकारच्या मनात सरकार पाडलं जाईल याची एवढी भीती का? सरकार पाडणं एवढं सोपं असतं तर देशातल नरेंद्र मोदी सरकार विरोधकांनी केव्हाच पाडलं असतं, असा टोलाही मुनगंटीवारांनी विरोधकांना लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकतीच शिवसेना नेते संजय राऊत यांना एक मुलाखत दिली. यात त्यांनी ऑपरेशन लोटस, असा उल्लेख करत काही भाष्यही केलं होतं. एवढंच नाही तर राऊतांनीही याच मुद्द्यावरून भाजपावर निशाणा साधला होता. आता हाच धागा धरत सुधीर मुनंगटीवार यांनी त्यांना टोला लगावला आहे. मुनगंटीवर म्हणाले, "आघाडी सरकारच्या मनात सरकार पडण्याची एवढी भीती का? असं कोणतंही सरकार पाडता येतं का? सरकार पाडणं एवढं सोपं असतं, तर देशातील सर्व विरोधकांनी एकत्र येत, 24 तास काहीही न खाता-पिता, बैठकांवर बैठका घेत, केंद्रातील मोदी सरकार आतापर्यंत पाडलं असतं. तसंच, तुमचं सरकार बहुमताचं आहे, ते पाडलं जाईल याची एवढी भीती का बाळगता?," असा प्रश्नही मुंगंटीवारांनी केला आहे.

...तर त्यांनी झोपेच्या गोळ्या घ्यावातयापूर्वी, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही रविवारी महाविकास आघाडीला टोले लगावले. महाविकास आघाडीमधील काही लोकांना सरकार पडण्याची भीती वाटत आहे. यामुळे त्यांना झोपही लागत नाही. त्यांनी झोपेच्या गोळ्या घ्यावात. असं पाटील म्हणाले होते.

पवारांना पाटलांचं उत्तर -यापूर्वी संजय राऊतांना दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले होते, गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे जे 105 आमदार निवडून आले, त्यात शिवसेनेचा मोठा वाटा होता. शिवसेनेची साथ नसती, तर भाजपच्या आमदारांचा आकडा 40 ते 50 पर्यंत खाली घसरला असता, यालाही चंद्रकांत पाटलांनी प्रत्युत्तर दिलं होतं.

पावसात भिजण्यापासून सगळं करून झालं. त्यानंतरही राज्यातील निवडणुकीत कोणाच्या किती जागा आल्या हे सर्वांनी पाहिलं आहे. निवडणुकीत सर्व पक्षांनी स्वातंत्र निवडणूक लढवली असती तर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या २० आणि काँग्रेसचा फक्त १० जागाच आल्या असत्या. तसंच, कुणाची किती ताकद आहे, हे बघायचंच असेल तर पुन्हा सगळे वेगवेगळे लढू. चारही पक्ष वेगवेगळे लढू. कुणाच्या जागा जास्त येतात ते बघू, असं आव्हानही चंद्रकांत पाटील यांनी पवारांना दिलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus : मानवी चाचणीच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत 'या' लसी; जाणून घ्या, केव्हापर्यंत होणार तयार?

चीनला घेरण्यासाठी चार देश तयार; 90 फायटर जेट, 3000 सौनिकांसह US एअरक्राफ्ट कॅरिअर हिंदी महासागरात

15 जूनची रात्र : गलवानमध्ये भारतीय जवानांची 'बायोनेट' फाइटिंग, 'तो' बंधारा फुटल्यानंही मारले गेले चिनी सैनिक

पंतप्रधान मोदींची लोकप्रियता वाढली, Twitterवरील फॉलोअर्सची संख्या 6 कोटींच्या पुढे!

बुरखा फाटला!, सरकार PLA सोबत संबंध असणाऱ्या कंपन्यांविरोधात अॅक्शन घेण्याच्या तयारीत

...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारSharad Pawarशरद पवारSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस