शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 06:25 IST

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले. 

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेच काय रणनीती असावी याबाबत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर शुक्रवारी झाली. तसेच फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले. 

भाजप नेत्यांच्या बैठकीला फडणवीस, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, मोहित कंभोज आदी उपस्थित होते. याचवेळी फडणवीस आणि भूपेंद्र यादव या दोघांनीच वीस मिनिटे बंदद्वार चर्चा केली.

निकालानंतर महायुतीच्या आमदारांना मुंबईत कसे आणायचे, याबाबत चर्चा करण्यात आली. महायुतीतील तिन्ही पक्षांच्या आमदारांना जिथे गरज असेल तिथून विशेष विमानाने मुंबईत आणले जाण्याचीही शक्यता आहे. शक्यतो शनिवारी रात्री किंवा रविवारी हे आमदार मुंबईत पोहोचावेत अशा पद्धतीचे नियोजन करण्यात आले आहे. 

१० ते १२ अपक्ष निवडून येतील

भाजपच्या गोटात असा अंदाज बांधण्यात आला आहे की अपक्ष, बंडखोर हे फार मोठ्या संख्येने निवडून येणार नाहीत. बऱ्याच मतदारसंघांमध्ये ते विजयाची समीकरणे बदलतील पण निवडून येणारे १०-१२ चेहरे असतील.

लाडकी बहीण योजना, ‘एक है तो सेफ है’चा नारा, केंद्र आणि राज्य सरकारच्या लोकाभिमुख योजनांना मतदारांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली आणि निकालामध्ये ते स्पष्टपणे दिसेल, असा विश्वास ज्येष्ठ नेत्यांनी बैठकीत व्यक्त केला. 

रावसाहेब दानवे यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले की, महायुतीला पूर्ण बहुमत मिळणार असल्याने आम्हाला अपक्षांची गरज भासणार नाही, ते सोबत आले तर स्वागतच असेल. स्वबळावर सत्ता मिळेल असा आमचा विश्वास आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाMahayutiमहायुती