शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

…अन्यथा गाठ माझ्याशी अन् धनगरांशी आहे; भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचं अजित पवारांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 11:18 IST

आगामी अर्थसंकल्पात तरी सत्य आणि न्यायानं धनगरांना निधी द्यावा. आश्वासनाचं पोतेरं फिरवू नये अन्यथा तुम्ही करत असलेल्या अन्यायाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही असं पत्र गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांना लिहिलं आहे.

मुंबई – राज्यात एकीकडे मराठा आरक्षण पुन्हा पेटत असताना दुसरीकडे धनगर समाजाच्या विविध मागण्यांवरुन भाजपा आमदार गोपीचंद पडळकर(BJP Gopichand Padalkar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना(DCM Ajit Pawar) पत्र लिहिलं आहे. स्वातंत्र्याच्या ७० वर्षात प्रस्थापितांनी धनगर समाजाची कोंडी केली होती. जोपर्यंत धनगर समाजाला ‘एसटी’चा दाखला मिळत नाही. मुघल, इंग्रज हर एक गनिमांना अंगावर घेऊन स्वातंत्र्याचा ध्वज उंचवणारा माझा समाज. माझ्या समाजाचा वापर  आज प्रस्थापितांच्या सतरंज्या उचलण्यासाठी व्हावा, अशी काही मोजक्या घराण्यांची इच्छा आहे असं सांगत पडळकरांनी पवार कुटुंबीयांवर आरोप केला आहे.

गोपीचंद पडळकर म्हणतात की, आरक्षण(Dhangar Reservation) मिळत नाही तोपर्यंत कोंडी फोडण्याची ताकद फडणवीस सरकारनं धनगर समाजासाठी दिलेल्या "जे आदिवासांनी ते धनगरांना" या धोरणांतर्गत महाराजा यशवंतराव होळकर महामेष योजनेसह २२ कल्याणकारी योजनेत होती. यासाठी १ हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली. मात्र प्रस्थापितांनी सत्ता ताब्यात घेऊन परत ३ कोटी धनगर समाजाच्या तोंडावर बोळा फिरवण्याचं काम केलंय. लॉकडाऊन, अतिवृष्टी, गावागावत हल्ले, आघाडीचं सरकार आलं की विस्थापितांना टाचेखाली चिरडण्याचा राक्षसी आनंद प्रस्थापितांना घ्यायचा असतो असं त्यांनी सांगितले.

तसेच आजही धनगर समाज अनेक सुविधांपासून वंचित आहे. धनगर वाड्यांवर नसलेल्या मुलभूत सुविधांमुळे अर्थचक्र बिघडले आहे. इतक्या सर्व समस्यांशी धनगर समाज कधी नव्हे इतका संघर्ष आजघडीला करतोय. त्यामुळे त्यांच्या लढवय्या बाहूंना बळ देऊन सामाजिक न्याय स्थापित करणं गरजेचे आहे. आगामी अर्थसंकल्पात तरी सत्य आणि न्यायानं धनगरांना निधी द्यावा. आश्वासनाचं पोतेरं फिरवू नये अन्यथा तुम्ही करत असलेल्या अन्यायाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. धनगरांच्या सक्षमीकरणाच्या योजना तातडीनं लागू करा, अन्यथा गाठ ३ कोटी धगनर बांधवांशी आणि गोपीचंद पडळकर यांच्याशी आहे लक्षात ठेवा असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.

दरम्यान, मागील अर्थसंकल्पात फडणवीस सरकारनं केलेल्या योजनांचे फक्त बाह्य स्वरुप बदलून नव्या घोषणा केल्या परंतु या योजना फक्त कागदावरच राहिल्या. यामुळे धनगर समाजाच्या तोंडावर बोळा फिरवण्यासाठीच तुम्ही घोषणा केल्या होत्या का? असा सवाल धनगर समाजाच्या मनात वारंवार उपस्थित राहत आहे. अस्तित्त्वावर प्रश्न उभा राहिला की, साधी मुंगीसुद्धा बलाढ्य हत्तीला लोळवते, तुम्ही ३ कोटी धनगर समाजाला हिणकस वागणूक देताय असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारGopichand Padalkarगोपीचंद पडळकरDhangar Reservationधनगर आरक्षणBJPभाजपा