शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

Maharashtra Political Crisis: “उद्धव ठाकरेंना दोन वर्षांत जमलं नाही, ते एकनाथ शिंदेंनी आठ दिवसांत करुन दाखवलं”

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2022 3:58 PM

Maharashtra Political Crisis: निष्ठा यात्रा काढण्याचा नैतिक अधिकार आदित्य ठाकरेंना नाही. राजकारण करण्यापेक्षा विकास कामांवर लक्ष दिले असते तर ही वेळ आली नसती, अशी टीका करण्यात आली आहे.

Maharashtra Political Crisis:एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांसह बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले असून, राज्यभर दौरे सुरू आहेत. यातच एकनाथ शिंदे गटाला राज्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. यातच आता आदित्य ठाकरे जळगाव दौऱ्यावर जाणार होते. मात्र, तब्येतीच्या कारणास्तव दौरा रद्द झाल्याचे सांगितले जात आहे. यातच उद्धव ठाकरेंना दोन वर्षांत जमलं नाही, ते एकनाथ शिंदेंनी आठ दिवसांत करुन दाखवलं, असा टोला भाजपने लगावला आहे. 

केवळ सत्तेसाठी पदे अन् राजकारण करु नका, आधी मातीशी निष्ठा राखा, शेतकऱ्यांची निष्ठा राखा, मग राजकारण करा या शब्दांत भाजप खासदार उन्मेश पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. चाळीसगाव तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी उन्मेश पाटील प्रसारमाध्यमांशी बोलत होते. एकीकडे कामांना परवानगी द्यायची नाही, दुसरीकडे निष्ठा यात्रा काढून शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळण्याचा आदित्य ठाकरे यांना अधिकार नसल्याची टीका उन्मेश पाटील यांनी केली. 

सरकार बदल्यानंतर ८ दिवसात या प्रस्तावाला मान्यता मिळाली

खान्देशात गिरणा नदीवर बलून बंधाऱ्यासाठी अनेकदा पर्यावरण मंत्री आदित्‍य ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला. मात्र, तब्बल दोन वर्ष उलटूनही परवानगी मिळाली नाही. ती परवानगी मिळाली असतील, तर खान्देशाच्या मातीशी निष्ठा राखण्याचा आणि बोलण्याचा अधिकार तुम्हाला मिळाला असता, अशी बोचरी टीका आदित्य ठाकरेंवर करत, सरकार बदल्यानंतर आठ दिवसात या प्रस्तावाला मान्यता मिळते, आणि आदित्य ठाकरे हे मंत्री असतानाही दोन दोन वर्ष त्याला मान्यता मिळत नाही, याला काय म्हणावे, असा प्रश्न पाटील यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच राजकारण करण्यापेक्षा तिरंग्यावर निष्ठा दाखवा, असा सल्लाही पाटील यांनी दिला. 

दरम्यान, राजकारण करण्यापेक्षा विकास कामांवर लक्ष दिले असते तर ही वेळ आली नसती, असा टोला पाटील यांनी लगावला. पाचोरा तालुक्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. पाचोरा तालुक्यातील कट्टर शिवसैनिक तसेच जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील यांच्यासह १०० समर्थक यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिंदे गटातील आमदार किशोर पाटील यांच्या निवासस्थानी रावसाहेब पाटील यांच्यासह संपूर्ण जिल्हा परिषदेचा गट शिंदे गटात सहभागी झाला आहे. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वीच कट्टर शिवसैनिकांनी शिंदे गटात सहभागी झाल्याने खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळBJPभाजपाAaditya Thackerayआदित्य ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे