शहरं
Join us  
Trending Stories
1
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
2
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
3
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
4
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
5
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
6
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
7
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
8
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
9
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
10
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
11
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
12
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
13
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
14
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
15
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
16
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
17
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
18
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
19
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 

भाजपाच नंबर वन!

By admin | Published: January 10, 2017 5:11 AM

राज्यात झालेल्या १९१ नगरपालिकांच्या निवडणुकीत सर्वाधिक १२०७ जागा आणि ७१ ठिकाणचे नगराध्यक्षपद पटकावून भारतीय जनता पार्टीने

मुंबई/नागपूर : राज्यात झालेल्या १९१ नगरपालिकांच्या निवडणुकीत सर्वाधिक १२०७ जागा आणि ७१ ठिकाणचे नगराध्यक्षपद पटकावून भारतीय जनता पार्टीने बाजी मारली असून काँग्रेस ९१९ जागा आणि ३४ नगराध्यक्षांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. शिवसेना व राष्ट्रवादी पक्ष अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी राहिले.राज्यातील १९१ नगरपालिकांसाठी चार टप्प्यांत निवडणूक झाली. नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून देण्याचा निर्णय भाजपाच्या चांगलाच पथ्यावर पडला. निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. पैशासाठी लोकांना बँकांसमोर लांबच लांब रांगा लावाव्या लागल्या. अनेकांनी लग्नकार्ये पुढे ढकलली. त्यामुळे नोटाबंदीचा सत्ताधारी भाजपाला फटका बसेल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र, तो खोटा ठरला. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि समस्त मंत्रिगण भाजपाने प्रचारात उतरविले होते. शिवाय, गरजेनुसार स्थानिक पातळीवर आघाडी करण्याचे धोरण पक्षाने ठेवल्याने त्याचाही फायदा भाजपाला झाला.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कुठेही प्रचाराला गेले नाहीत. त्याचा फटका सेनेला बसला. काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आणि स्थानिक नेते प्रचारात उतरले होते. काँग्रेसने स्वबळावर ही निवडणूक लढविली. त्याचा फायदा झाल्याचे दिसून येते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची दाणादाण उडाली. स्वत: पक्षाध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि डझनभर नेत्यांनी शहरं पिंजून काढली तरी या पक्षाच्या पदरात केवळ २२ ठिकाणचे नगराध्यक्षपद पडले.

चौथा टप्पाही जिंकलाचौथ्या टप्प्यात नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील ११ नगरपालिकांच्या झालेल्या निवडणुकीतही भाजपानेच बाजी मारली. सात नगराध्यक्ष पदांसह सर्वाधिक जागा भाजपाच्या पारड्यात पडल्या आहेत. काँग्रेस व इतरांना दोन नगराध्यक्ष पदं मिळाली. चौथ्या टप्प्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही.

काटोलमध्ये ‘विदर्भ माझा’काटोलमध्ये भाजपातून बाहेर पडलेले चरणसिंग ठाकूर यांनी आपल्या उमेदवारांना राजकुमार तिरपुडे यांच्या ‘विदर्भ माझा’ या पक्षाच्या चिन्हावर लढवित २३ पैकी १८ जागा जिंकून सत्ता मिळवली. विदर्भ माझाच्या वैशाली ठाकूर नगराध्यक्षपदी निवडून आल्या. विदर्भाच्या नावावर नव्यानेच स्थापलेल्या पक्षाचा नगराध्यक्ष झाल्याने विदर्भवाद्यांचे मनोबल उंचावले.