शहरं
Join us  
Trending Stories
1
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
2
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
5
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
6
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
7
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
8
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
9
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
10
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
11
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
12
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
13
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
14
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
15
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
16
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

ठाकरे -शिंदे मनोमिलनास भाजपमधूनच होतोय विरोध 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 11:17 AM

हिंदुत्वात ठाकरे वाटेकरी नकोत, एकत्र आल्यास रणनीती फसेल 

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मनोमिलन घडवून आणण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूंच्या काही नेत्यांकडून होत असले तरी शिंदे यांनी पुन्हा ठाकरेंसोबत जाणे भाजपला पसंत नसेल, असे म्हटले जात आहे.

शिवसेनेत फूट पाडून एकनाथ शिंदे यांना भाजपने सोबत घेतले व सरकार स्थापन करताना शिंदे यांना मुख्यमंत्रिपद दिले. शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजप अशी युती करून २०२४ लोकसभा, विधानसभा निवडणुका जिंकाव्यात, अशी रणनीती भाजपने आखली आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेवरील एकछत्री अमलाला शह देणे आणि भाजपशी चांगला समन्वय राखून पुढे जाण्याच्या शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला सोबत घेणे हा भाजपचा दुहेरी उद्देश आहे. मात्र, उद्या ठाकरे-शिंदे एकत्र आले तर भाजपची सगळीच रणनीती फसणार आहे. त्यामुळेच भाजपला ठाकरे-शिंदे एकत्र येणे मान्य नसेल, असे मानले जाते. 

हिंदुत्वामध्ये ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचा वाटा भाजपला नको आहे. ठाकरे यांनी गेली काही वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व एकूणच भाजपवर सडकून टीका केली व अलीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीका सुरू केली. शिवसेना केवळ महाराष्ट्रात असली तरी त्यांच्याकडून होणाऱ्या टीकेला राष्ट्रीय प्रसिद्धी मिळते. त्यामुळे एकदाचा ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या अस्तित्वावरच घाला घालण्याची रणनीती भाजपने आखली व शिंदे यांच्या नेतृत्वात बंड घडवून आणले. त्यामुळे आता ठाकरे-शिंदे एकत्र येणे भाजपच्या संपूर्ण खेळीला तडा देणारे असेल. त्यामुळे भाजप ते होऊ देणार नाही, असे म्हटले जात आहे.

भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले, की ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येतील असे आम्हाला वाटत नाही. तसे होणार असेल तर एकूणच सर्व गोष्टींचा फेरविचार आम्हाला करावा लागेल. एक निश्चित अशी भूमिका घेऊन शिंदे हे आमच्यासोबत आले आहेत आणि ते परत वेगळा निर्णय घेतील असे आम्हाला वाटत नाही.

एकत्र येण्यासाठी अजूनही आहे वावउद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावे आणि शिंदे यांना सन्मानाने बोलावून सोबत घ्यावे. शिंदे हे मुख्यमंत्रिपदी कायम राहतील आणि ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेतच सर्व ५४ आमदार, १८ खासदार काम करतील, असा मार्ग काढण्याचा प्रयत्न शिवसेनेतील दोन्ही बाजूंच्या काही नेत्यांकडून सध्या होत आहे. ठाकरे व त्यांच्या परिवाराविरुद्ध आम्ही कोणतीही वैयक्तिक टीका करणार नाही, अशी भूमिका शिंदे गटाने घेतली. 

एकनाथ शिंदे यांना अजूनही सन्मानाने बोलवा, चर्चा करा व तोडगा काढा, अशी भूमिका शिंदे गटाचे प्रवक्ते  दीपक केसरकर यांनी मांडली आहे. जे सोडून गेले ते परत आले तर मातोश्रीचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले असतील, अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे-शिंदे एकत्र येण्याला अजूनही वाव असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे