शहरं
Join us  
Trending Stories
1
टोलमाफी, २ नदीजोड प्रकल्पांना मंजुरीसह राज्य मंत्रिमंडळाने घेतले १९ मोठे निर्णय
2
Big Breaking: मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर कारला टोलमाफी
3
“CMपदाच्या चेहऱ्यापेक्षा महाभ्रष्ट महायुती सरकार घालवणे महत्त्वाचे”: बाळासाहेब थोरात
4
"सरकारला उशिराने सुबुद्धी, निर्णय निवडणुकीपुरता न ठेवता..."; मुंबई टोलमाफीवर राज ठाकरेंची रोखठोक प्रतिक्रिया
5
कोल्हापूर दौरा, अचानक समोर तालमीतला मित्र दिसला, मोहोळांनी गाडी थांबवून गळाभेट घेतली...
6
स्वप्निलला राज्य सरकारकडून २ कोटी! वडील सुरेश कुसाळेंच्या आरोपांनंतर मोठी घोषणा
7
अरे देवा! जेलमध्ये रामलीला, कैद्यांनी केला वानरांचा रोल; सीतेला शोधायला गेले अन् पळाले
8
Reliance Jio नं लाँच केले २ नवे रिचार्ज प्लॅन्स; केवळ १ रुपयाचा फरक, कोणता आहे बेस्ट? 
9
भाजपा खासदाराने आश्रमात घुसून साधूला केली मारहाण, संतप्त अनुयायांचं आंदोलन
10
कॉमेडीशी संबंध नसताना प्राजक्ताला कसा मिळाला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शो? आधी नकार दिला पण...
11
'सिंघम अगेन'सोबत 'भूल भूलैय्या ३'ची मोठी टक्कर! अखेर कार्तिक आर्यनने सोडलं मौन; म्हणाला-
12
'दिवसाढवळ्या हत्या होत असतील तर बरोबर नाही, सलमान खानच्या जवळच्यांना सुरक्षा पुरवा'; मंत्री हसन मुश्रीफ यांची मागणी
13
“राज्यात एक फूल दोन हाफ सिंघम, मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द खरा करावा”; संजय राऊतांचा हल्लाबोल
14
नीना गुप्तांनी शेअर केला नातीचा गोड फोटो, म्हणाल्या- "माझ्या मुलीची मुलगी..."
15
उद्यापासून आचारसंहिता लागणार? महायुती सरकारची आज शेवटची मंत्रिमंडळ बैठक!
16
चौदाव्यांदा बोनस शेअर देण्याच्या तयारीत 'ही' दिग्गज कंपनी, स्टॉकनं १ लाखाचे केले ४० लाख; जाणून घ्या
17
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची सुरक्षा वाढवली, IB च्या अलर्टनंतर सुरक्षेत बदल
18
पाकिस्तान जिंकू रे देवा, पण...; टीम इंडियाचं सेमीफायनलचं तिकीट 'शेजाऱ्यांच्या' हाती, पाहा गणित
19
बनावट नोटा बनवण्याची ट्रिक सांगून तरुणाला घातला ५.५ लाखांचा गंडा; काय आहे हे प्रकरण?
20
Hyundai Motor IPO मध्ये 'हे' गुंतवणूकदार आजपासून करू शकतात गुंतवणूक, ग्रे मार्केटमध्ये स्टॉक आपटला

“भाजपातून ८० टक्के लोक आमच्याकडे”; शरद पवारांच्या विधानावर महायुतीतील मंत्र्यांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 10:33 AM

Maharashtra Assembly Election 2024 Politics: शरद पवारांचा गैरसमज लवकरच दूर होईल. विधानसभेला मोठे इनकमिंग भाजपात होईल. शरद पवारांकडे किती शिल्लक राहतील हा प्रश्न आहे, असा टोला लगावण्यात आला आहे.

Maharashtra Assembly Election 2024 Politics: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता कधी लागणार, निवडणुका कधी होणार आणि मतमोजणी कधी असेल, याकडे आता राज्याचे लक्ष लागल्याचे सांगितले जात आहे. सर्वच पक्षांनी तयारीवर मोठा भर दिला असून, जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी निवडणुकीत कितपत प्रभाव पाडू शकेल, याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यातच शरद पवार यांनी केलेल्या विधानाला महायुतीतील भाजपा मंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

शिस्तीचा पुरस्कार करणारा पक्ष अशी ओळख असलेल्या त्या पक्षातून लोक आता बाहेर पडत आहेत. जुन्या काळातील जनसंघ किंवा भाजपचा कार्यकर्ता संघटनेची चौकट मोडून कधीही बाहेर जाणारा नव्हता, त्याचे कारण तेव्हाचे नेतृत्व कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवणारे होते. आज ही स्थिती राहिलेली नाही. ठराविक लोकांच्या हातात सत्ता ठेवण्याच्या प्रवृत्तीमुळे लोक बाहेर पडत आहेत, हा अनुभव त्याच पक्षातील एका नेत्याने मला सांगितला. मागील दोन महिने आमच्या पक्षाकडे येणाऱ्या लोकांची आवक वाढली आहे. आमच्याकडे येणारे ८० टक्के लोक भाजपातून येत आहेत, असे शरद पवार यांनी म्हटले होते. याला भाजपा नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिले.

शरद पवारांकडे किती शिल्लक राहतील हा प्रश्न आहे

ज्यांची संपूर्ण हयात फोडाफोडीत गेली. त्यांच्याबद्दल बोलण्याचा प्रश्नच नाही. प्रत्येक गोष्ट ते त्याच नजरेने पाहतात. त्यांचा गैरसमज लवकरच दूर होईल. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे इनकमिंग भाजपात होईल. ठाकरे गटातून तर अनेक लोक येतील, मात्र शरद पवारांकडे किती शिल्लक राहतील हा प्रश्न आहे, या खोचक शब्दांत राधाकृष्ण विखे पाटील यांनी पलटवार केला.

तुम्हाला चार वेळा मुख्यमंत्रीपद मिळाले, काय परिवर्तन केले?

तुम्हाला चार वेळा मुख्यमंत्रीपद मिळाले. तुम्ही काय परिवर्तन केले. निम्मा बारामती तालुका आजही दुष्काळाच्या छायेत आहे. समन्यायी पाणी वाटपाचे भूत यांच्याच काळात राज्यावर आले. पवारांच्या दबावाखालीच थोरात यांनी त्यावेळी यावर सह्या केल्या. येणाऱ्या निवडणुकीत दूध का दूध आणि पाणी का पाणीच होणार, असा एल्गार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

दरम्यान, मुख्यमंत्रीपदाचे त्यांचे स्वप्न हे स्वप्नच राहील. तुम्ही सत्तेत येणार नाही तर तुम्हाला मुख्यमंत्रीपदाची काळजी करण्याचे कारण नाही. कौन बनेगा मुख्यमंत्री असेच काम सध्या त्यांचे सुरू आहे, असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाना पटोले यांना लगावला.   

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवारRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा