शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
4
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
5
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
6
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
9
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
10
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
11
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
12
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
13
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
14
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
15
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
16
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
17
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
18
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
19
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
20
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

भाजपा-शिवसेनेमुळे राज्याचा विकास खुंटला

By admin | Published: July 10, 2017 3:00 AM

केंद्रातील भाजपाने जीएसटी ही नवी करप्रणाली आणली;

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : केंद्रातील भाजपाने जीएसटी ही नवी करप्रणाली आणली; परंतु त्यामुळे महागाई वाढली आहे. लहान-मोठ्या व्यापाऱ्यांत याविषयी असंतोष आहे. गुजरातमध्ये तर जीएसटीच्या विरोधात व्यापारी रस्त्यावर उतरले आहेत. हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नाही. भाजपा आणि शिवसेना यांच्यातील वादामुळे राज्याचा विकास खुंटला आहे, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले.वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याला मार्गदर्शन करताना पवार बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी मंत्री गणेश नाईक, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील, युवती प्रदेशाध्यक्षा स्मिता पाटील, प्रदेश सरचिटणीस संजीव नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी झटकन निर्णय घेऊन शेतकऱ्यांची कर्जे माफ केली; परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अजूनही विचार करीत असल्याची टीका पवार यांनी केली. नोटाबंदीनंतर देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. राज्य सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. जनतेची दिशाभूल करणाऱ्या या सरकारला घरचा रस्ता दाखविण्याची वेळ आली आहे. राज्यातील सत्ता परिवर्तनाची मुहूर्तमेढ नवी मुंबईतूनच होईल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, गणेश नाईक यांची भाषणे झाली. तर मेळाव्याचे निमंत्रक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनी प्रास्ताविक केले. मेळाव्याला महापौर सुधाकर सोनावणे, पक्षाचे जिल्हा निरीक्षक मुनाफ हकीम, आमदार शशिकांत शिंदे, आमदार निरंजन डावखरे, आमदार जयदीप गायकवाड, सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदूराव, स्थायी समितीच्या सभापती शुभांगी पाटील, महिला अध्यक्षा माधुरी सुतार, युवक जिल्हाध्यक्ष सूरज पाटील, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष दिनेश पारेख आदी व्यासपीठावर उपस्थित होते.