शहरं
Join us  
Trending Stories
1
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
2
दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
3
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
4
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
5
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
6
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
7
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
8
'तेरे करके' पेक्षा No Look Shot ची चर्चा; नताशाच्या पोस्टवर 'हार्दिक' कमेंटचं ट्विस्ट
9
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
10
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
11
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
12
"हा विजय केवळ मोदीजींमुळेच शक्य झाला"; हरयाणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री सैनी यांचे विधान
13
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: काँग्रेसचे 'खटाखट-खटाखट' मॉडेल फेल: अनुराग ठाकूर
14
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
15
'आजच बारामतीचा उमेदवार जाहीर करा'; अजित पवार म्हणाले, "तुमच्या मनातील..."
16
"कुठे आम्ही ६० जागा जिंकण्याच्या बाता मारत होतो आणि…’’, निकालांबाबत कुमारी शैलजा म्हणाल्या
17
जम्मू-काश्मीरच्या 'या' सात जागांवर काँग्रेस आणि एनसीत मैत्रीपूर्ण लढत; जाणून घ्या निकाल...
18
"मल्लिकार्जुन खर्गेजी पत्ता सांगा, 'ती' जिलेबी...", भाजप खासदार तथा केंद्रीय मंत्र्याचा राहुल गांधींना बोचरा टोला
19
नवी मुंबईत महायुतीला झटका, शिंदेसेनेत बंडखोरी होणार, विजय नाहटा तुतारी हातात घेणार
20
काँग्रेसचा हरयाणात पराभव; कुमारी शैलजा म्हणाल्या,'वेळेवर मौन बाळगणे..."

भाजपा थापाड्यांचा पक्ष

By admin | Published: October 10, 2015 1:25 AM

केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पॅकेजची घोषणा करणाऱ्यांना गेले वर्षभर विकासाचा विसर पडला होता. आता निवडणुकीच्या तोंडावर पाकीट वाटत फिरत आहेत. वाटेल ती आश्वासने

कल्याण : केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पॅकेजची घोषणा करणाऱ्यांना गेले वर्षभर विकासाचा विसर पडला होता. आता निवडणुकीच्या तोंडावर पाकीट वाटत फिरत आहेत. वाटेल ती आश्वासने देऊन नागरिकांची फसवणूक करणारा भाजपा हा थापाड्या पक्ष असून, त्याच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याणात केले.स्पोटर््स कॉम्प्लेक्सच्या सभागृहात मनसेचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी ठाकरे बोलत होते. ‘राज्यात नवीन सरकार येऊन कोणताही फरक पडलेला नाही. जे काँग्रेसवाले करायचे, तेच आता भाजपा करीत आहे. ‘१०० दिवसांत अच्छे दिन’ येणार होते, पण हाताला काहीच लागले नाही. आधी काँग्रेसने लुटले, परंतु भाजपाने तर एका वर्षातच लुटले. दुष्काळ जाहीर न करता, दुष्काळ निवारण करासाठी लुटालूट सुरू केली आहे. दुष्काळ तर जाहीर करा, मगच पेट्रोल, डिझेलचे दर वाढवा,’ असा आरोप त्यांनी केला. ‘कल्याण-डोंबिवलीत लुटताना एकत्र होते, आता वेगळे होऊन एकमेकांना शिव्या घालत आहेत,’ अशा शब्दांत ठाकरे यांनी शिवसेनेवरही तोफ डागली, तसेच पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांवरही टीका केली. भाजपातील जातीपातींना खतपाणी घालणाऱ्यांपासून सावध रहा. २० आॅक्टोबरनंतर चार ते पाच जाहीर सभा घेणार आहे. विकले जाऊ नका व विकले गेल्यास नोटा खऱ्या आहेत की नाही, ते तपासून घ्या,’ असा टोला ठाकरेंनी हाणला. (प्रतिनिधी)अ‍ॅपची योजना राबविणार!‘नाशिकचा सर्व कारभार मी अ‍ॅपच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविला आहे. त्यामुळे नागरिकांना पालिकेचे उंबरठे झिजवावे लागत नाहीत. अशीच योजना कल्याण-डोंबिवलीत राबविण्याची माझी योजना आहे,’ असे ते म्हणाले.