शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

होय 288 जागांवर उमेदवारांची चाचपणी: भाजप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 13:19 IST

गेल्यावेळी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत युती करणाऱ्या भाजप-शिवसेनेने त्यावेळी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवली होती.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेत युती झाली असली तरीही, विधानसभा निवडणुकीत मात्र युती होणार का? यावरून वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहे. त्यातच आता भाजपने संपूर्ण 288 मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सूर केली असल्याची माहिती खुद्द भाजप प्रवक्ते व आमदार गिरीश व्यास यांनी दिली आहे. नागपुरात बोलताना ते म्हणाले.

गेल्यावेळी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत युती करणाऱ्या भाजप-शिवसेनेने त्यावेळी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवली होती. तर आगामी विधानसभा निवडणुकीत सुद्धा युती फिसकटली जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे भाजपने आधीच स्वबळाची तयारी सुरु केली असल्याचे दिसत आहे. आणि यावर आमदार व्यास यांनी अधिकृतरीत्या शिक्कामोर्तब केला आहे. नागपूर येथे बोलताना ते म्हणाले की, युती करण्यासाठी भाजप-शिवसेना दोन्ही पक्षात चर्चा सुरु असली तरीही, आम्ही राज्यातील सर्वच्या सर्व 288 जागांवर संभाव्य उमेदवार कोण असणार याची चाचपणी सूर केली असल्याचे ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत सुद्धा आम्ही संपूर्ण 48 मतदारसंघाचा आढावा घेतला होता. त्याचप्रमाणे आता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच्या सर्व 288 जागांवर चाचपणी सुरु केली असून, त्यासाठी भाजपने सर्वेक्षण सुद्धा सुरु केले असल्याचे व्यास म्हणाले. ऐनवेळी युती तुटली तर उमेदवार शोधण्याची वेळ येऊ नयेत म्हणून भाजपने आधीच सर्वच्या सर्व 288 मतदारसंघात संभाव्य उमेदवार कोण असणार याची चाचपणी करण्याचे काम सुरु केले असल्याचे बोलले जात आहे. मात्र युती बाबत काय निर्णय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.