शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

आगामी निवडणुकांतही भाजप अव्वल स्थानावरच राहील, मुख्यमंत्र्यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2016 7:00 PM

मागील निवडणुकीत काँग्रेसने प्रशासनाचा गैरवापर करून सत्ता मिळवली. परंतु यावेळी सरकार भाजपचे आहे. त्यांच्याप्रमाणे आम्ही प्रशासन यंत्रणेचा गैरवापर न करता

ऑनलाइन लोकमत शिर्डी, दि. 23 - नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या मागील निवडणुकीत काँग्रेसने प्रशासनाचा गैरवापर करून सत्ता मिळवली. परंतु यावेळी सरकार भाजपचे आहे. त्यांच्याप्रमाणे आम्ही प्रशासन यंत्रणेचा गैरवापर न करता कार्यकर्त्यांच्या ताकतीवर आमचा बालेकिल्ला परत खेचून आणू, असा विश्वास व्यक्त करतानाच राज्यात भाजपा क्रमांक एकचा पक्ष आहे व आगामी नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकांतही आम्ही क्रमांक एकवरच राहू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.उत्तर महाराष्ट्रातील भाजपा पदाधिका-यांच्या शिर्डी येथील बैठ्ठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे होते. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, पाटबंधारे मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे, विजयकुमार रावल, जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर उत्तर महाराष्ट्रातील भाजपाचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, राज्यात पंधरा वर्षांपासूनची सत्ता उलथवून टाकत भाजपा सत्तेवर आला. गेल्या दोन वर्षात राज्यातील पाच हजारांहून अधिक ग्रामपंचायतींवर भाजपाची सत्ता आली आहे. विधानसभा व लोकसभा निवडणुकीत भाजपाचे चिन्ह सर्वदूर पोहोचले. भाजपाच्या ताकतीवर राज्यात परिवर्तन घडणार आहे. नगरपालिका व महानगरपालिकांमध्येही राज्यात मोठे परिवर्तन घडणार असून भाजप हा क्रमांक एकचा पक्ष असेल. भाजपासोबत जे येतील त्यांना बरोबर घेवू. अन्यथा स्वबळावर लढून अव्वल स्थान मिळवू असेही ते म्हणाले. राज्यातील जनतेने पंधरा वर्षांतील भ्रष्ट कारभार बघितला आहे. आता आमचा अडीच वर्षांचा पारदर्शक कारभार जनतेपुढे आहे. एकत्रित बसून नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे. नगरपालिका निवडणुका जिंकण्याची खूणगाठ प्रत्येक लोकप्रतिनिधीने बांधावी. नाशिक पदवीधर मतदार संघ भाजपासाठी अतिशय प्रतिष्ठेचा आहे. विधानसभेत बहुमत असले तरी विधानपरिषदेत बहुमत नाही. त्यामुळे चांगले निर्णय घेण्यास विलंब लागतो. त्यासाठी नाशिक पदवधीर मतदार संघात भाजपाचाच उमेदवार निवडणून आला पाहिजे, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचेही भाषण झाले. साई संस्थानचे विश्वस्त सचिन तांबे यांनी आभार मानले. (तालुका प्रतिनिधी)---------स्थानिक निवडणुकीसाठी आघाडीचानिर्णय जिल्हा पातळीवरस्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका भाजप पक्षाच्या चिन्हावरच लढणार आहे. मित्रपक्षांबरोबर आघाडी करायची की नाही यासंबंधीचा निर्णय जिल्हापातळीवर घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. परंतु मित्रपक्षाव्यतिरिक्त आघाडी करण्याबाबत प्रदेशाची परवानगी घ्यावी लागणार असल्याचेही दानवे यांनी स्पष्ट केले.