शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
4
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
5
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
6
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
7
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
8
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
9
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
10
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
12
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
13
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
14
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
15
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
16
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
17
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
19
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
20
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार

भाजपाचे खान्देशात ‘डॅमेज कंट्रोल!’

By admin | Published: July 05, 2016 1:07 AM

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर खान्देशातील बहुजन समाजामधील नाराजी दूर करण्यासाठीच धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे

- मिलिंद कुलकर्णी, जळगाव

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर खान्देशातील बहुजन समाजामधील नाराजी दूर करण्यासाठीच धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करून भाजपा नेतृत्वाने एका दगडात अनेक पक्षी टिपले आहेत. मूळ शिवसैनिक असलेले डॉ. भामरे हे पहिल्यांदाच खासदार झालेले असतानाही त्यांंना मंत्रिपद देऊन खडसेंना शह देण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.डॉ. भामरे हे धुळे जिल्ह्यातील मालपूर (ता. साक्री) येथील रहिवासी. त्यांना राजकीय वारसा आहे. आजोबा सीताराम गोविंद पाटील हे सत्यशोधक चळवळीतील अग्रणी नेते होते. पुढे कम्युनिस्ट पक्षात ते सक्रिय झाले. वडील रामराव पाटील यांनीही कम्युनिस्ट पक्षापासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. परंतु पुढे ते काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात सहभागी झाले. आई गोजरताई भामरे या १९७२ ते ७८ या काळात साक्री विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या आमदार म्हणून निवडून आल्या. परंतु रामराव पाटील यांनी धुळे व कुुसुंबा मतदारसंघातून एकेकदा निवडणूक लढवली, पण त्यांना यश मिळाले नाही. राजकीय वारसा आणि वडिलांचे सहकार क्षेत्रातील कार्य पाठीशी असूनही डॉ. सुभाष भामरे हे राजकारणात सक्रिय नव्हते. ते कर्करोग तज्ज्ञ म्हणून धुळ्यात प्रसिद्ध होते. एक सेवाभावी डॉक्टर हीच त्यांची खरी ओळख. २००९ मध्ये त्यांनी शिवसेनेतर्फे विधानसभेची निवडणूक लढवली, परंतु त्यांना अपयश आले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी अचानक भामरे यांचे नाव चर्चेत आले. नितीन गडकरी यांच्यापर्यंत भामरे यांचे नाव पोहोचले आणि त्यांचे तिकीट निश्चित झाले.

गटातटापासून दूर डॉ. भामरे हे दोन वर्षांपूर्वी भाजपामध्ये आले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनिल गोटे आणि जयकुमार रावल हे भाजपाचे दोन उमेदवार पुन्हा निवडून आले. गोटे आणि भामरे यांनी धुळ्यात एकमेकांविरुद्ध निवडणूक लढविली होती. त्यांचे संबंध धुळे-इंदूर रेल्वे मार्गाच्या मंजुरीवरून ताणले गेले. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या भेटीची छायाचित्रे, रेकाँर्डिंग पत्रकार परिषदांमध्ये ऐकविण्यापर्यंत वाद विकोपाला गेले होते. पक्षात दोन्ही नवीन असले तरी गोटे हे खडसे समर्थक म्हटले जातात. खडसे यांच्यावर आरोप झाल्यानंतरदेखील गोटे उघडपणे त्यांच्या समर्थनार्थ पुढे आले होते. धुळ्यात जल्लोष! : धुळ्याचे खासदार डॉ.सुभाष भामरे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळणार असल्याचा संपूर्ण शहरात जल्लोष करण्यात आला. त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची बातमी धुळ्यात येऊन धडकताच शहरातील भाजपा कार्यकर्त्यांनी आतषबाजी करीत जल्लोष केला. डॉ. भामरे यांच्या रूपाने धुळे जिल्ह्याला दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळत आहे. पहिल्यांदा काँग्रेसच्या राजवटीत इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात विजय नवल पाटील यांना दळणवळण राज्यमंत्रिपद मिळाले होते.डॉ़ सुभाष भामरे यांनी खासदारच नव्हे तर मंत्री होऊन धुळ्याचा चेहरामोहरा बदलावा, अशी माझी इच्छा होती, ती पूर्ण झाली आहे़ या मंत्रिपदामुळे विकास होण्यास मदत होणार आहे़ आम्हाला हा निर्णय अनपेक्षित होता़ - रामराव पाटील, वडील