शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेवर भाजपची पहिली प्रतिक्रिया; आशिष शेलार म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 15:45 IST

BJP on shivaji statue collapse: मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळला. या दुर्घटनेवर सत्ताधारी भाजपकडून पहिली प्रतिक्रिया देण्यात आली. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली.

Ashish Shelar On shivaji statue collapsed: 'राजकीय भाष्य करणार नाही, पण सरकारच्या वतीने आम्ही महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागतो', अशी प्रतिक्रिया मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी व्यक्त केली. मुंबईत माध्यमांशी बोलताना आशिष शेलारांनी घडलेल्या घटनेबद्दल खंत व्यक्त केली. महाराजांचा अपमान महाराष्ट्र आणि देश सहन करू शकत नाही, असेही ते म्हणाले. 

विक्रोळीमध्ये आरंभच्या दहीहंडी उत्सवाला आशिष शेलार उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना शेलारांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेबद्दल भाष्य केले. त्यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. 

"मला यावर कोणतेही राजकीय भाष्य करायचे नाही. जी घटना घडली, ती दुर्दैवी, वेदनाजनक, क्लेशदायक, दुःखदायक आहे", असे शेलार म्हणाले. 

सगळ्या गोष्टी समोर येतील -आशिष शेलार

"संपूर्ण महाराष्ट्र हळहळतोय. आमच्या राजाच्या कुठल्याही पद्धतीचा अपमान हा महाराष्ट्र काय, संपूर्ण हिंदुस्थान सहन करू शकत नाही. यामागे कोण आहे? कसे घडले? काय घडले? दोषी कोण आहेत? एफआरआय काय? या सगळ्या गोष्टी समोर येतील", अशी ग्वाही शेलार यांनी यावेळी बोलताना दिली.  

"जी घटना घडली, ती कुठल्याही कारणाने घडली. याबद्दल खरंतर महाराष्ट्राच्या जनतेची सरकारच्या वतीने आम्ही माफी मागतो. पण, या सगळ्यातून हा पुतळा उभा करू. आपला अभिमान, स्वाभिमान आणि हिंदुत्व टिकवू याबद्दल कटिबद्धता सांगतो", अशी भूमिका शेलार यांनी मांडली. 

'किती लज्जास्पद आहे हे'; आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र

या घटनेवरून राजकारण तापले आहे. आदित्य ठाकरे यांनी एक पोस्ट करत सत्ताधारी महायुतीवर निशाणा साधला आहे. 

"आपलं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या पुतळ्याच्या बाबतीतही भाजप भ्रष्टाचार करेल असं वाटलं नव्हतं... इथेही त्यांचा एक कॉन्ट्रॅक्टर मित्र आहे... इथेही कामाचा दर्जा भयानक आहे... इथेही भावनेला नव्हे तर निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून उद्घाटन करण्यात आलंय", असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.

"आणि मग, त्यांचे नेहमीचेच ट्रोल्स आणि निर्लज्ज राजकारणी आता दोष भारतीय नौदलावर ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत. किती लज्जास्पद आहे हे", अशी टीका आदित्य ठाकरेंनी महायुतीवर केली आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईAshish Shelarआशीष शेलारShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजMahayutiमहायुतीPoliticsराजकारण