शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
3
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
4
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
5
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
6
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
7
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
8
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
9
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
10
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
11
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
12
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
13
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
14
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
15
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
16
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
17
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
18
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
19
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
20
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!

भाजपाची वाटचाल अध्यक्षीय राजवटीकडे

By admin | Published: July 05, 2017 4:22 AM

‘सातत्याने नवीन अध्यादेश काढून अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. नगरपालिकेचे नगराध्यक्ष थेट

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘सातत्याने नवीन अध्यादेश काढून अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. नगरपालिकेचे नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याच्या निर्णयानंतर ग्रामपंचायतींचे सरपंचही थेट जनतेतून निवडण्याचा डाव खेळणाऱ्या भाजपाची वाटचाल अध्यक्षीय राजवटीकडे सुरू आहे,’ अशी टीका राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार मंगळवारी साताऱ्यात आले होते.सरकारच्या धोरणांवर सडकून टीका करताना पवार म्हणाले, ‘नगरपालिका व ग्रामपंचायतींमध्ये भाजपला बहुमत मिळत नाही, म्हणून अध्यक्ष व सरपंच निवडी थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिगटाने घेतलेल्या या निर्णयामुळे गावागावात वादाची ठिणगी पडणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बहुमत एका बाजूला तर नगराध्यक्ष व अथवा सरपंच एका बाजूला, अशी स्थिती निर्माण होईल. सरपंचाने एखादा ठराव मांडला तर त्याला बहुमतातील विरोधकांकडून निश्चितपणे विरोध होईल. साहजिकच राजकीय वादावादीमुळे गावांचा विकास खुंटण्याची शक्यता आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात याबाबत सरकारला आम्ही जाब विचारणार आहोत.’ परदेशातील काळा पैसा आणणार, १५ लाख रुपये लोकांच्या खात्यांत जमा करणार, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी, शेती उत्पादनाला आधारभूत किंमत, नोकऱ्या उपलब्ध करणार, उद्योग क्षेत्र वाढविणार अशा घोषणा मोदींनी निवडणुकीपूर्वी केल्या होत्या. मात्र, एकही घोषणा सत्यात उतरलेली नाही. धोतर-लुगडीही महाग़़़निवडणुकीत केलेल्या घोषणा मोदी सरकारने पूर्ण केल्या नाहीत़ जीएसटी लागू करून सर्वसामान्यांचे धोतर-लुगडीही सरकारने महाग केली, अशी टीकाही अजित पवार यांनी केली.