शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचा प्लॅन; महाराष्ट्रातील नेत्यांची दिल्लीत खलबतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 14:52 IST

केंद्रीय मंत्र्यांना लोकसभा मतदारसंघनिहाय प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपानं तयारी सुरु केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज दिल्लीत होते. त्यावेळी भाजपाचे केंद्रीय मंत्र्यांसोबत त्यांनी बैठक घेत संघटनात्मक कामाचा आढावा घेतला. लोकसभा प्रवास योजना या मोहिमेवर बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीला मंत्री रावसाहेब दानवे, कपिल पाटील, नारायण राणे, भारती पवार यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. 

या बैठकीत केंद्रीय मंत्र्यांना लोकसभा मतदारसंघनिहाय प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या मंत्र्यांनी महिन्यातून १-२ दिवस त्या मतदारसंघासाठी द्यावा असं बैठकीत ठरलं आहे. राज्यातील विकास कामांसाठी राज्य सरकार काम करतेय. संघटना म्हणून मी माझी जबाबदारी पार पाडतोय. मुंबईतही आज रात्री राज्याचे सहसंघटन मंत्री, राष्ट्रीय प्रभारी यांच्या उपस्थितीत राज्यातील मंत्री, संघटनांचे पदाधिकारी यांच्यात समन्वय बैठक आयोजित करण्यात आली आहे. यात संघटना आणि सरकार यातून विकासाचं पाऊल पुढे टाकायचं आहे असं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 

त्याचसोबत महाराष्ट्रात २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जे पी नड्डा यांच्या नेतृत्वात आम्ही राज्यात ४५ लोकसभा मतदारसंघात भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना एकत्रित निवडणुका लढू आणि जिंकू असं निश्चित केले आहे. राज्यातील जनता महाविकास आघाडीला वैतागली आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकत्रित राज्याचा कारभार विकासाच्या दृष्टीने पुढे घेऊन जात आहे असं बावनकुळेंनी म्हटलं. 

विरोधकांचा डाव हाणून पाडूजे प्रकल्प राज्याबाहेर गेले. त्याबद्दल माहिती अधिकारात माहिती मागवली तर ते सर्व प्रकल्प मविआ सरकारच्या नाकर्तेपणामुळे आणि मुख्यमंत्री मंत्रालयात नसल्याने, राज्यात पोषक वातावरण निर्माण न झाल्याने हे प्रकल्प राज्याबाहेर गेले. खोटं बोला पण रेटून बोला, सरकार गेल्यामुळे अस्वस्थ आहेत. शेवटची घरघर राहिले ते थांबवण्यासाठी हा केविळवाणा प्रयत्न आहे. खोटं नरेटिव्ह सेट करून तिन्ही पक्ष वेगवेगळ्या तोंडाने बोलतात. सरकार काम करतेय त्याला अडथळा आणण्याचा प्रयत्न करतायेत. आम्ही भाजपा जिल्हाजिल्ह्यात महाविकास आघाडीचा खोटा अजेंडा हाणून पाडू असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. 

मविआला उमेदवारही मिळणार नाहीत महाविकास आघाडीच्या नेत्यांना पुढच्या काळात अनेक प्रवेशाचे बॉम्बस्फोट होणार, तिन्ही पक्षातील नेते भाजपात येतील. विरोधकांना उमेदवार मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल. मविआ कार्यकर्ते थांबवण्यासाठी हे सगळे एकत्रित नरेटिव्ह सेट करून ठेवतायेत. अडीच वर्ष जे पाप, बेईमानी केली त्यावरून जनता महाविकास आघाडीला रस्त्यावर आणण्याचं काम करणार आहे असा टोला भाजपानं लगावला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :BJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी