शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

मराठवाड्यात धान्य बाजारात निरुत्साह

By admin | Published: July 16, 2015 4:05 AM

पावसाने दडी मारल्याने मराठवाड्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या येथील कृषी उत्पन्न बाजारात समितीत निरुत्साह दिसत आहे. खरीप पिकांची शाश्वती नसल्याने शेतकऱ्यांनी

- प्रशांत तेलवाडकर,  औरंगाबादपावसाने दडी मारल्याने मराठवाड्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या येथील कृषी उत्पन्न बाजारात समितीत निरुत्साह दिसत आहे. खरीप पिकांची शाश्वती नसल्याने शेतकऱ्यांनी शिल्लक शेतीमाल विकणे थांबविले आहे. खरेदीदारांनीही आखडता हात घेतल्याने दररोज साधारणपणे ५ कोटींची उलाढाल होणाऱ्या बाजारपेठेत सध्या केवळ ४५ ते ५० हजारांचे व्यवहार होत आहेत.पावसाने दगा दिल्याने शेतातील पिके वाळण्याच्या मार्गावर आहेत. विभागात दुबार पेरणीचे संकट उभे आहे. पावसाचे कोणतेही चिन्ह नसल्याने शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील धान्य, कडधान्य विक्रीला न काढण्याचा निर्णय घेतला. त्याचा धान्य बाजारावर परिणाम झाला आहे. दैनंदिन आवक जवळपास ९५ टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे गहू, तूर, हरभरा, उडीद, मूग, हरभरा व तूरडाळीचे भाव कडाडले आहे. मागील ३० वर्षांत अशी कठीण परिस्थिती उद्भवली नव्हती. तीन वर्षांपासून सतत दुष्काळी परिस्थिती आहे; पण धान्याच्या आवकेवर एवढा मोठा परिणाम पहिल्यांदाच जाणवत आहे, असे खरेदीदार शिखरचंद सेठी यांनी सांगितले.उत्पन्न घटले : जून २०१४ मध्ये ५़३९ लाख रुपये मार्केट फी जमा झाली होती. जून २०१५ मध्ये बाजार समितीचे उत्पन्न घटून २़३५ लाख रुपये झाले. जुलैमध्ये १५ दिवसांत अवघी २० हजार ११६ रुपयांची मार्केट फी जमा झाली आहे. आठवडाभरापूर्वी फळ-भाजीपाला मार्केटमध्ये दररोज १० ते १२ हजार रुपये मार्केट फी जमा होत होती. ती सध्या ५ ते ६ हजार रुपयांवर आली होती.