शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला

By admin | Published: March 07, 2016 3:43 AM

तालुक्यातील भिवपुरी रोड स्टेशनजवळ असलेल्या पाली-भुतिवली धरणामध्ये, मुंबई येथील एक महाविद्यालयीन विद्यार्थी पाण्यात बुडाला होता.

कर्जत : तालुक्यातील भिवपुरी रोड स्टेशनजवळ असलेल्या पाली-भुतिवली धरणामध्ये, मुंबई येथील एक महाविद्यालयीन विद्यार्थी पाण्यात बुडाला होता. त्याच्याबरोबर असलेल्या अन्य तीन तरु णांना मात्र बुडण्यापासून वाचविण्यात यश आले होते. शनिवारी दुपारी ३ वाजता ही घटना घडली होती. नेरळ पोलिसांच्या मदतीने बुडालेल्या विद्यार्थ्याची शोधमोहीम सुरू होती. अखेर रविवारी त्या विद्यार्थ्याचा मृतदेह पाली-भुतिवली धरणात आढळला. या पूर्वी चार तरु णांचा या धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला असून, ही पाचवी घटना आहे.तो बुडाल्याची माहिती मिळताच, नेरळ पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मदतकार्य सुरू केले होते, परंतु शनिवारी रात्रीपर्यंत बुडालेल्या विद्यार्थ्याचा शोध लागला नव्हता. मुंबई येथील एडीएंट ज्युनिअर महाविद्यालय साकीनाका येथील मयंक हरिशंकर गुप्ता (१७), राघवेंद्र दुबे (१८) त्यांच्यासोबत विद्या निकेतन महाविद्यालय घाटकोपर या महाविद्यालयातील अनित सिंग (१८) आणि मनीष दिनेश सिंग हे चौघे पाली-भुतिवली या धरणावर शनिवारी दुपारी पोहायला आले होते. त्या वेळी पोहताना ही घटना घडली. त्यातील मनीष सिंग हा बुडाला असून, मयंक गुप्ता याच्या पोटात पाणी गेल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने, त्याला नेरळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. त्यानंतर त्याला उल्हासनगर येथे हलविण्यात आले. शनिवारी रात्रीपर्यंत मनीषचा शोध सुरू होता. अखेर रविवारी सकाळी त्याचा मृतदेह धरणात आढळून आला. त्यानंतर सकाळी ९ वाजता त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. (वार्ताहर)