शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

नववीचे इतिहासाचे पुस्तक वादाच्या भोवऱ्यात

By admin | Published: July 04, 2017 4:59 AM

भारताचे माजी पंतप्रधान आणि संगणकपर्वाचे प्रणेते राजीव गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह उल्लेख असल्याने इयत्ता नववीचे ‘इतिहास व राज्यशास्त्र’ हे

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : भारताचे माजी पंतप्रधान आणि संगणकपर्वाचे प्रणेते राजीव गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह उल्लेख असल्याने इयत्ता नववीचे ‘इतिहास व राज्यशास्त्र’ हे पुस्तक वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या गोष्टीचा तीव्र निषेध करून हा चुकीचा इतिहास तातडीने बदलावा, अशी मागणी पुणे शहर काँग्रेसने केली आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून नववीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला असून, नवी पुस्तके नुकतीच बाजारात आली आहेत. इतिहासाच्या पुस्तकातील एका धड्यात राजीव गांधींबद्दल आक्षेपार्ह सोयीचे लिखाण करण्यात आले आहे. ‘‘माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कारकिर्दीत बोफोर्स कंपनीकडून घेण्यात आलेल्या लांब पल्ल्याच्या तोफ खरेदीसंदर्भात झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात राजीव गांधी यांच्यावर बरीच टीका झाली. राजकीय भ्रष्टाचार हा या काळातील निवडणुकांचा एक महत्त्वाचा मुद्दा बनला आणि सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला.’’ असे या पुस्तकात म्हटले आहे. मात्र, बोफोर्स तोफ खरेदी प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने राजीव गांधी निर्दोष असल्याचा निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाची माहितीही या पुस्तकात देण्यात आलेली नाही. पुस्तकामध्ये १९९१नंतरचे बदल, या परिच्छेदामध्ये माजी पंतप्रधान दिवंगत नरसिंह राव यांचे छायाचित्र छापण्यात आलेले नाही. राव यांच्या १९९१ ते १९९५ या कारकिर्दीत रामजन्मभूमी व बाबरी मशिदीचा प्रश्न ऐरणीवर आला, असे म्हटले आहे. मात्र बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी भाजपाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, माजी मंत्री मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या त्यांच्यावर लखनऊच्या न्यायालयात खटला सुरू आहे, याचा उल्लेख टाळण्यात आला आहे. या गोष्टींवर आक्षेप नोंदवत विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न असून, चुकीचा इतिहास लिहिणे कदापि सहन करणार नाही, असा इशारा काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी दिला आहे. याबाबत शिक्षण आयुक्तांना निवेदनही देण्यात आले आहे. विषय समितीपुढे मांडू नववीच्या इतिहास पुस्तकातील काही लिखाणाबद्दल घेण्यात आलेला आक्षेप संबंधित विषय समितीपुढे मांडला जाणार आहे. त्याबाबत विषय समितीकडून योग्य तो निर्णय घेतला जाईल. अभ्यासक्रमामध्ये बदल करण्याचे सर्वस्वी अधिकार या विषय समितीला आहेत.- सुनील मगर, संचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ