महाड : कर्जाची परतफेड करू न शकलेल्या महाड तालुक्यातील गावडी येथील शेतकऱ्याने विषारी किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली . ही घटना बुधवारी घडली. काशीराम मालुसरे (६२) असे त्याचे नाव आहे. त्यांनी शेतीसाठी एका राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज घेतले होते. शिवाय काहीजणांकडून उसने पैसे घेतले होते. मात्र यावर्षी फारसे पीक न आल्यामुळे ते हैराण झाले होते. मागील आठवड्यात सर्वजण झोपलेले असताना त्यांनी कीटकनाशक प्यायले. त्यांना मुुंबईतील जे. जे. रुग्णायात हलवण्यात आले. बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. (वार्ताहर)
महाडमध्ये कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
By admin | Published: February 06, 2015 1:59 AM