शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

दोघा भावांनी काढला ४५ फूट विहिरीतील गाळ

By admin | Published: May 16, 2016 5:06 AM

दोघा भावांनी कोणत्याही यंंत्राशिवाय महिनाभर परिश्रम घेऊन ४५ फूट विहिरीमधील दहा फूट गाळ काढला.

मानाजी धुमाळ,

सांगली-दुष्काळी परिस्थितीमध्ये रेठरेधरण (ता. वाळवा, जि. सांगली) येथील दोघा भावांनी कोणत्याही यंंत्राशिवाय महिनाभर परिश्रम घेऊन ४५ फूट विहिरीमधील दहा फूट गाळ काढला. शिवाय तो स्वत:च डोकीवरून वाहून विहिरीबाहेर टाकला.उत्तम व हणमंत पंडित पाटील अशी त्यांची नावे आहेत. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर कुटुंबाची व शेतीची जबाबदारी खांद्यावर पडलेल्या पाटील बंधूंनी कष्टाच्या जोरावर शेती फुलवली. शेतीमध्ये उत्पन्न निघाले नसल्यामुळे आणि दुष्काळामुळे काम नसल्याने त्यांनी विहिरीमधील गाळ यारीच्या साहाय्याने काढण्याऐवजी स्वत:च काढण्याचा निर्णय घेतला. सकाळी सहा ते दुपारी एक व दुपारी तीन तास विश्रांती घेऊन पुन्हा दुपारी चार ते सायंकाळी सातपर्यंत श्रम करून टिकाव, खोरे व पाट्यांच्या साहाय्याने विहिरीमधील गाळ बाहेर काढला. विहिरीमध्ये सुरुवातीला दोन ते तीन फूट पाणी होते. त्यामुळे बादलीच्या साहाय्याने पाणी विहिरीबाहेर टाकले. एका महिन्यात सुमारे १० फूट म्हणजे साधारणत: १४ ट्रॉली गाळ उपसण्यात दोघांना यश आले.