शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

तहानलेल्या वानराकडून बाटलीतलं पाणी क्षणात फस्त

By admin | Published: April 16, 2017 8:04 PM

साताऱ्यातील पाऱ्याने शनिवार, रविवारी विक्रमच केला. चक्क 41 अंश सेल्सिअसचा पल्ला ओलांडल्याने जीव कासावीस होत आहे

ऑनलाइन लोकमतसातारा, दि. 16 - साताऱ्यातील पाऱ्याने शनिवार, रविवारी विक्रमच केला. चक्क 41 अंश सेल्सिअसचा पल्ला ओलांडल्याने जीव कासावीस होत आहे. यवतेश्वर, कास, बामणोली येथील जंगलात पशुपक्ष्यांचे पाण्याअभावी हाल होत आहेत. एका वानराने चक्क पर्यटकाने टाकलेल्या खाद्यपदार्थांकडे न पाहता पाण्याची अख्खी बाटली काही क्षणात पिऊन रिकामी केली.सातारा शहराच्या पश्चिमेकडील भाग हा जास्त पर्जन्याचा म्हणून ओळखला जातो. तसेच येथील वनसंपदाही समृद्ध आहे. कित्येक पशुपक्ष्यांचा वावर या परिसरात आहे. परंतु यंदाच्या हंगामातील उच्चाकी 41 अंश सेल्सिअसचा पल्ला गाठला. यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणावर उष्मा तयार होत आहे. अंगाला उन्हाचे चटके बसत असताना ठिकठिकाणी भूगर्भातील पाणी आटल्याची परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. शहराच्या पश्चिमेकडील भाग अतिवृष्टीचा असला तरी तीव्र डोंगर उतारामुळे पावसाचे पाणी भूगर्भात न मुरता मोठ्या प्रमाणावर वाहून जात आहे. बहुतांशी ठिकाणी असणारे तळी, झरे, पाणवठ्यावरील पाण्याचे प्रमाण अत्यल्प होत असून, काही ठिकाणी पाणी आटल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.परिसरात झाडाझुडपांचा निवारा तसेच तोरणे, अंबुळगी, करवंदी, आळू, जांभळे हा रानमेवा पशुपक्ष्यांची भूक भागवत असला तरी पशुपक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यांना तहान भागवणे अवघड झाले आहे. हे वास्तव भीषण चित्र या वानराकडे पाहिल्यावर लक्षात येते. खाद्यपदार्थ समोर ठेवला असतानाही त्याकडे न पाहता मिळालेल्या बाटलीतील पाणी गटागटा पिऊन पाण्याची बाटली काही मिनिटांतच रिकामी केली. या वानराला किती दिवसांची तहान लागली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अन्नाच्या शोधात भटकंती करणाऱ्या पशुपक्ष्यांना आसपास पाणी न मिळाल्यास जिवाची तडफड होते. कित्येक जिवांना प्रसंगी जीवही गमवावा लागत असावा. ही समस्या जाणून त्यांच्या भावना ओळखून शक्य असेल त्या ठिकाणी अनेकविध उपक्रमांतून काही प्रमाणात पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सर्वांवर येऊन पडते. काही पर्यटकांनी रानमेव्याच्या शोधात त्यांची गाडी रस्त्यानजीक लावली असता झाडावर बसलेल्या वानरसेनेतील काही वानरं गाडीनजीक घुटमळू लागली. दरम्यान, खाऊचा पदार्थ समोर दिला असता वानर पदार्थाकडे दुर्लक्ष करीत होते. त्यातील एक जण पाण्याचा घोट घेत असताना वानराचे पूर्ण लक्ष त्या पाण्याच्या बाटलीकडे होते. बहुतेक पाणी हवे असावे, ही त्या वानराची भावना ओळखून त्याच्या समोर पाण्याची बाटली ठेवली असता, कशाचीही भीती न बाळगता वानराने बाटली तोंडाला लावली अन् काही मिनिटांतच रिकामी केली. तहानेने व्याकूळ झाल्यानंतर पाणी प्यायला मिळाल्याने त्याच्या चेहऱ्यावरील समाधानाचे भाव काही वेगळेच सांगून जात होते.