शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

वास्तव समोर आणणे, हे भगवीकरण नव्हे

By admin | Published: October 10, 2015 3:11 AM

देशातील इतिहास, संस्कृती व शिक्षणक्षेत्रात डाव्या विचारसरणीच्या लोकांनी आपले विचार लादले व अनेक बाबी काळाच्या पडद्याआड गेल्या. प्रत्यक्षात ज्यावेळी इतिहासातील

नागपूर : देशातील इतिहास, संस्कृती व शिक्षणक्षेत्रात डाव्या विचारसरणीच्या लोकांनी आपले विचार लादले व अनेक बाबी काळाच्या पडद्याआड गेल्या. प्रत्यक्षात ज्यावेळी इतिहासातील तथ्य समोर आणण्याचा प्रयत्न होतो तेव्हा भगवीकरणाची ओरड करण्यात येते. वास्तविकता समोर आणणे हे भगवीकरण नाही, असे परखड मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले.रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात आयोजित अखिल भारतीय राष्ट्रीय शिक्षण महासंघाच्या सहाव्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाला अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष खा. अजय संचेती, अखिल भारतीय राष्ट्रीय शिक्षण महासंघाचे अध्यक्ष डॉ.विमल प्रसाद अग्रवाल व अन्य मान्यवर उपस्थित होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शिक्षणाचे योग्य बीजारोपण झाले नाही व त्यामुळेच अनेक समस्या व आव्हाने निर्माण झाली. देशाच्या शिक्षणप्रणालीतून संस्कृती व इतिहासाचे मूळ समोर आले पाहिजे आणि विकास साधताना हे आवश्यकच आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी शिक्षणक्षेत्राच्या व्यावसायिकीकरणावर चिंता व्यक्त केली. इतर क्षेत्रांप्रमाणे या क्षेत्रातदेखील सामाजिक मूल्यांचा ऱ्हास झालेला दिसून येत आहे. अनेक शिक्षकांनी शिक्षणाला व्यवसाय समजून काम सुरू केले आहे. यातून आदर्श पिढी कशी निर्माण होईल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘एकम् सत्’ या स्मरणिकेचे तसेच ‘एकात्ममानव दर्शन’ या शैक्षणिक मंथन विशेषांकाचे विमोचन करण्यात आले. या अधिवेशनाला विविध राज्यांतील बाराशेहून अधिक प्रतिनिधी आले आहेत. आयुर्वेद विद्यापीठ गरजेचेराज्यात आयुर्वेद विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात शासन सकारात्मक विचार करेल. या विद्यापीठाचे मॉडेल कसे असावे? ते पूर्णत: सरकारी विद्यापीठ असावे की, आयुर्वेद क्षेत्रात काम करणाऱ्या नामवंत संस्थांनी व व्यक्तींनी एकत्र येऊन स्थापन करावे? किंवा विद्यापीठ कायद्याअंतर्गत स्थापन व्हावे याबाबत शासनस्तरावर विचार करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी येथे दिली. श्री आयुर्वेद महाविद्यालयाच्या सुवर्ण जयंती महोत्सवाअंतर्गत सुवर्ण जयंती स्मरणिका ‘बखरश्रीची’चे प्रकाशन तसेच १७ रसाचार्यांच्या सन्मान त्यांच्या हस्ते करण्यात आला.