शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
2
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
3
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
4
"घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गंमतीदार किस्सा
5
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
6
‘लाडकी बहीण’ योजनेत पुन्हा गैरप्रकार समोर; ६ लाडक्या भावांचे अर्ज, ‘असा’ लागला शोध
7
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
8
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
9
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
10
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
11
इटलीच्या PM मेलोनी यांना डेट करताहेत इलॉन मस्क? चर्चांना उधाण, स्पष्टीकरण देत म्हणाले...  
12
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली
13
“ब्रिजभूषण सिंहचा एन्काउंटर का केला नाही, RSSच्या लोकांना वाचवायला अक्षय शिंदेला संपवले”
14
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
15
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
17
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
18
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
19
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
20
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स

ब्रिटिशकालीन २६ पूल धोकादायक

By admin | Published: August 06, 2016 2:42 AM

महाड येथील सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर रायगड जिल्ह्यातील २६ ब्रिटिशकालीन पूल सरकारच्या हिटलिस्टवर आले आहेत

आविष्कार देसाई,

अलिबाग- महाड येथील सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर रायगड जिल्ह्यातील २६ ब्रिटिशकालीन पूल सरकारच्या हिटलिस्टवर आले आहेत. यामध्ये पाऊणशे वर्षांपासून नागोठणे येथील शिवकालीन असणारा ४३६ वर्षे जुन्या पुलाचा समावेश आहे. पुलाचे स्ट्रक्टरल आॅडिट करण्यासाठी अद्याप सरकारकडून आदेश आलेले नाहीत. पुलाचे आॅडिट न करता त्या पुलाखालून वाहणारी नदी, बेकायदा रेती उत्खनन, माती, पर्यावरण, आजूबाजूचा परिसर, बदललेली भौगोलिक स्थिती, तेथे असणारे अन्य पूल अशा विविध मुद्यांचे आॅडिट होण्याची गरज आहे. तसे झाले नाही तर महाडसारख्या अन्य दुर्घटना होऊन हजारो निष्पाप जीव पुन्हा जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.महाडमधील सावित्री नदीवरील पूल पडल्याने आतापर्यंत २२ जणांचे बळी गेले आहेत, तर अन्य बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यात येत आहे. महाडचा पूल पडल्याने सरकार खबडून जागे झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने सर्वच ब्रिटिशकालीन पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे फर्मान सोडले. ब्रिटिशांनी बांधलेल्या पुलांनी जवळजवळ शंभरी पार केलेली आहे. त्यामुळे पूल बांधताना जी परिस्थिती होती, ती बदलली आहे, पर्यावरणामध्ये कमालीचा बदल झाला आहे. पुलांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदा रेती उत्खनन होते. त्यामुळे रेती उत्खननाचा मुद्दा विचारात घेणे गरजेचे आहे. ब्रिटिश राजवटीत उभारण्यात आलेल्या पुलांबाबत मुदत संपल्यावर डागडुजीसाठी वेळच्या वेळी माहिती देण्यात येत आहे. परंतु स्थानिक प्रशासनाकडून पुलांच्या डागडुजीकडे तसेच देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. नदीच्या परिसरामध्ये वाढलेली नागरी वस्ती, ब्रिटिशांनी बांधलेल्या पुलाच्याच बाजूला नव्याने बांधलेले पूल यांचाही आॅडिटमध्ये प्राधान्यक्रमाने समावेश करणे आवश्यक आहे. तसे केले तरच परिपूर्ण आॅडिट होऊन नागरिकांचा प्रवास सुरक्षित होईल. रोहा : महाड येथील सावित्री नदीवरील ८८ वर्षे जुना ब्रिटिशकालीन पूल वाहून गेल्यानंतर राज्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. रोहा तालुक्यात एकूण ६ मोठे व ३३ लहान पूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतात. मुंबई-गोवा महामार्गावरील निडी, वाकण, कोलाड या ठिकाणी मिळून चार मोठे पूल आहेत. यातील प्रमुख पुलांचे वयोमान ५० वर्षांहून अधिक आहे. रोहा-अष्टमीला जोडणारा जुना पूल कुंडलिकेच्या प्रवाहात आजही तग धरून आहे. १५८० मध्ये बांधण्यात आलेल्या शिवकालीन अंबा नदीवरील पुलावरून जाण्यास सध्या अवजड वाहने व बसला बंदी घालण्यात आली आहे. मात्र हलकी वाहने, दुचाकी आजही पुलाचा उपयोग करतात. या पुलामध्ये निडी, वाकण येथील अंबा नदीवरील पूल, कोलाडजवळील मिहसदरा व कुंडलिका नदीवरील पुलांचा समावेश आहे. हे चारही पूल मुंबई-गोवा महामार्गाच्या स्थापनेपासून असल्याने ८० वर्षांहून अधिक जुने आहेत. आयपीसीएल कारखान्याकडे जाणारा पूल वगळता उर्वरित पुलांचे बांधकाम १९५९ ते १९६0 काळातील आहे. चारही पूल मुंबई-गोवा महामार्गाच्या स्थापनेपासून असल्याने ८० वर्षांहून अधिक जुने आहेत. मोठ्या पुलांमध्ये ६ पुलांचा समावेश असून त्यांची लांबी किमान ३० मीटरहून अधिक आहे. यात रोहा शहर व अष्टमी गाव यांना जोडणारा कुंडलिका नदीवरील पूल, खारेपाटी गावाजवळील गुजर कातळजवळील पूल, निडी-भातसई गावांना जोडणारा पूल, वरसेतील गंगा नदीवर असणारा पूल, आयपीसीएल कारखान्याकडे जाण्यासाठी उभारलेला नागोठणेतील पूल आदींचा समावेश होतो. >जिल्हा प्रशासनाला आतापर्यंत मिळालेल्या माहितीमध्ये २६ ब्रिटिश कालीन पूल आढळून आले आहेत. ती यादी अजूनही अपडेट होईल. सरकारकडून अद्यापही प्रशासनाला लेखी आदेश आलेले नाहीत.- सतीश बागल, निवासी उपजिल्हाधिकारी, रायगड