शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
3
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
4
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
5
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
7
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
8
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
9
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
10
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
11
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
12
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
13
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
14
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
15
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
16
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
17
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
18
प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली ‘ती’ घरे होणार नियमित; नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये सर्वेक्षण
19
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
20
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप

ब्रिटीशकालीन कळवा पूल वाहनांसाठी बंद!

By admin | Published: November 05, 2016 3:40 AM

ठाणे आणि कळव्याला जोडणाऱ्या कळवा खाडीवर असलेल्या ब्रिटीशकालीन पूल पवई आयआयटीने तो दोन दिवसात पूर्णपणे बंद करावा, असे स्पष्ट केले

ठाणे : महाड आणि पोलादपूर मार्गावरील सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पूल वाहून गेल्यानंतर ठाणे महापालिकेनेदेखील येथील ठाणे आणि कळव्याला जोडणाऱ्या कळवा खाडीवर असलेल्या ब्रिटीशकालीन पूल पवई आयआयटीने तो दोन दिवसात पूर्णपणे बंद करावा, असे स्पष्ट केले होते. परंतु त्याची दखल पालिकेने १३ दिवसानंतर घेतली असून, अखेर आता हा पूल सर्वच वाहनांसाठी आणि पादचाऱ्यांसाठीदेखील कायमचा बंद करण्यात आला आहे. महाड येथील सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पुल वाहून गेल्याने महाराष्ट्रातील सर्वच ब्रिटीशकालीन पुलांचे स्ट्रॅक्चरल आॅडीट करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार ठाण्यातही ठाणे आणि कळव्याला जोडणारा सुमारे १५० वर्षापूर्वीचा ब्रिटीशकालीन पूल आहे. दगडांचा वापर करून हा पूल उभारण्यात आला आहे; परंतु तीन वर्षांपूर्वी या पुलाच्या बुरजाचे काही दगड निखळू लागल्याने हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला होता. त्यानंतर या पुलाला काहीशी डागडुजी करून हा पूल दुचाकी आणि तीनचाकी हलक्या वाहनांसाठी खुला करण्यात आला होता. परंतु पालिकेने पुन्हा २०१४ मध्ये केलेल्या एका सर्व्हेनंतर या पुलावरुन अवजड वाहने जाणे शक्य नसल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. दुचाकी आणि तीनचाकी वाहनांना येथून प्रवेश दिला जात होता. दरम्यान महाडच्या घटनेनंतर पालिकेने हा पुल ४ आॅगस्टपासून हलक्या वाहनांसाठी देखील बंद केला होता. परंतु येथे लावण्यात आलेले बॅरीकेट्सच्या मधून दुचाकींची वाहतूक सुरुच होती. पादचारी देखील आपला जीव मुठीत घेऊन येथून चालत होते. (प्रतिनिधी)>दुचाकी सोडाच पादचाऱ्यांसाठीही धोकादायकमागील महिन्यात आयआयटीचा अहवाल महापालिकेकडे आला होता. या अहवालानुसार येथून दुचाकी सोडाच पादचाऱ्यांसाठीही पूल धोकादायक असल्याचे नमूद केले होते. दोन दिवसात पूर्णपणे बंद करावा असेही सांगितले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक वळवावी लागेल.