शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

अपेक्षाभंग करणारा अर्थसंकल्प

By admin | Published: March 19, 2017 1:42 AM

राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कोणतीही तरतूद नाही. केवळ मागील अंदाजपत्रकातील घोषणा यंदा पुन्हा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा अर्थसंकल्प म्हणजे

- आ. जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (माजी अर्थमंत्री)

राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कोणतीही तरतूद नाही. केवळ मागील अंदाजपत्रकातील घोषणा यंदा पुन्हा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा अर्थसंकल्प म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचा अपेक्षाभंग असून तो निराशाजनक आहे. अर्थसंकल्पात राज्य सावरण्याचा कोणताही प्रयत्न न करता केवळ सवंग लोकप्रिय घोषणा करण्याचे काम अर्थमंत्र्यांनी केले आहे. प्रगतीची कोणतीच दिशा दिसत नाही वा त्यादृष्टीने कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नाही. कोणत्याही प्रमुख तरतुदी न केल्याने राज्याची आर्थिक परिस्थिती संकटात सापडली आहे. त्याचेच एक उत्तम उदाहरण म्हणून आजच्या अर्थसंकल्पाकडे बघावे लागेल. विकास वाढीचा दर काढण्यासाठी नवीन पद्धती अनुसरल्या जात आहेत. परंतु मुळच्या पद्धतीने विकास वाढीचा दर काढला तर तो एवढा येणार नाही, अशी खात्री आहे. राज्यातील अनुशेष भरून काढण्यासाठी राज्य सरकारने पुरेशा प्रमाणात लक्ष दिलेले नाही. राज्य सरकारला जलसिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी अपयश आले आहे. राज्यपालांनी देखील त्याबाबत कडक भूमिका घेतलेली आहे.